Friday, June 28, 2019

मेघ आणि यक्षप्रिया


मेघांचा गडगडाट ऐकून यक्षप्रिया इमारतीच्या गच्चीवर आली. प्रियतमाच्या संदेशाने भिजलेल्या पहिल्या पावसात ती मनसोक्त भिजली. पण हे काय अचानक तिच्या अंगाची लाही-लाही होऊ लागली. पहिल्या पावसाच्या तेजाबी जलधारांनी तिचा चेहरा जाळून टाकला होता. तिचे सौंदर्य नष्ट झाले होते.  

एका इमारती कडे मेघाचे लक्ष गेले, एक स्त्री रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेली होती. तिचा चेहरा नुकताच तेजाबी पावसात भिजल्यामुळे कुरूप झालेला होता. लोक कुजबुज करत होते, आषाढच्या मेघ वरून सर्व काही बघत होता. यक्षप्रियेचा असा अंत पाहून त्याला अतीव दुख झाले. या सर्वाला आपणच जवाबदार आहोत, असे त्याला वाटले. आता परतताना रामगिरी वर यक्षप्रियेचा संदेशाची वाट पाहणाऱ्या यक्षाला काय सांगणार. काही क्षण मेघ तिथेच थबकला. मनात विचार आला उदरातील पाणी घेऊन परत फिरावे व समुद्रात रिकामे करावे.  पण त्याला वरूण राजाचा आदेश आठवला. जमिनीवर काय घडत आहे, याची चिंता न करत दिलेले पूर्वनिर्धारित कर्तव्य पूर्ण केले पाहिजे. मेघ दोन अश्रू गाळुन पुढच्या प्रवासाला निघाला. 

No comments:

Post a Comment