Sunday, May 31, 2015

नदीचे भविष्य


 पूर्वी पाणी असलेल्या नद्या आज कोरड्या झालेल्या आहेत. एवढेच काय अनेक महाकवी कालिदास यांना आवडणारी क्षिप्रा नदीचे पात्र ही कोरडे पडले आहे. नर्मदेच्या पाण्यामुळे ती कशीतरी श्वास तरी घेते आहे.  पण गावाकडच्या  अनेक लहान लहान नद्या केंव्हाच दिवंगत झाल्या आहेत  किंवा नाल्याच्या स्वरूपात वाहतात आहे. उदा: नागपूरची नाग नदी (लोक या नदीला नालाच म्हणतात).


हिमाच्छादित मुकुट माझा 
वितळून गेला केंव्हाच

हिरवे वस्त्र जरतारी
जीर्णशीर्ण झाले आज. 

गोड पाण्याचा भंडार
उदरात नाही आज.  

हे समुद्राकांशी नदी 
नाही मजजवळ जीवन प्रवाह.
विरून जावे लागेल तुला 
मनुष्यकृत वाळवंटात



गुरं-ढोरं पुरात गेली वाहून
पीक सगलं खलास झालं
पुढे वाचण्यासाठी ....

वरुण राजाला साकडं





 




No comments:

Post a Comment