Saturday, May 30, 2015

जंगल पूर्वीचे आज महानगर झाले

जंगल  पूर्वीचे 
आज महानगर झाले 
पहिल्या पेक्षा जास्त 
खतरनाक झाले. 


भरल्या पोटी वाघ 
करत नव्हता शिकार. 
बेधुंध कार आज 
कधीही घेते प्राण. 

तेंव्हा दरवळत होता 
सुगंध मलयज गिरीचा.
पेट्रोलच्या वासाने आज 
कासावीस होतो प्राण.

कांव कांव कावळ्यांचे
घरटे उंच मीनारांवर
अंगणातली चिवताई 
कुठे हरवली आज.

***
रेशमी कोशात शोधले
मधाचे मोहोळ त्याने ......
पुढे वाचण्या साठी 

ऐसेच जीवन जगते

 



No comments:

Post a Comment