Monday, April 21, 2025

समर्थ विचार: ग्रंथ वाचल्या शिवाय नाव ठेवणारा मूर्ख असतो

समूळ ग्रंथ पाहिल्याविण. 
उगाच ठेवी जो दूषण. 
गुण सांगतां पाहे अवगुण. 
तो एक पढत मूर्ख. 
(दासबोध: 2.10.26)

समर्थ म्हणतात कोणत्याही ग्रंथाची समीक्षा करण्यापूर्वी तो ग्रंथ वाचला पाहिजे. उत्तम गुरूंकडून त्या ग्रंथातील शब्दांचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यानंतर त्या ग्रंथाची समीक्षा केली पाहिजे. ग्रंथातील गुण आणि दोष इत्यादीचे चिंतन आणि मनन करून, त्या ग्रंथाचा सार ग्रहण केला पाहिजे. त्या ग्रंथातील गुण आपल्याला घ्यायचे आहे आणि दोष टाकून द्यायचे आहे. 

कबीर दास ही म्हणतात:  

साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाय.
सार -सार को गहि थोथा देई उड़ाय.

ज्या प्रमाणे धान्यातील भूसा, कचरा, खड़े इत्यादि धान्यातून वेगळे करण्यासाठी सूपाला हाताने जोरात फटकारावे लागते. हाताने सूप फटकारताना  डोक्याचा आणि डोळ्यांचा वापर ही करावा लागतो. तसे नाही केले तर कचर्‍या सोबत धान्य सूप फटकारताना उडून जाईल.  

आपले अधिकान्श ग्रंथ अत्यंत प्राचीन असल्याने आणि त्या वेळी प्रिंटिंग प्रेसचे अस्तित्व नसल्याने, अनेक सुलेखकांनी त्यात भेसळ केली आहे. ती चांगली आणि वाईट दोन्ही आहे. त्यामुळे प्राचीन ग्रंथ वाचताना, कबीरदासचा हा दोहा नेहमीच लक्षात ठेवला पाहिजे. माझा एक दलित कबीरपंथी सहकारी होता. मनुस्मृती बहुतेक ब्राह्मणांनी दलितांना गुलाम बनविण्यासाठी लिहली असावी असे त्याचे मत होते. पण त्याला वाचण्याची आवड होती. एक दिवस लाईब्रेरीतून मनुस्मृती आणून त्याला वाचायला दिली आणि म्हंटले,  कबीरदासच्या नजरेतून या पुस्तकातील गुण दोष वेगळे करून तुझे मत मला सांग.  काही दिवसांनी त्याने पुस्तक परत केले आणि म्हणाला बहुतेक धर्म आणि दलित विरोधी नेताच मनुस्मृतीचा विरोध करतात. त्याच्या विचारात झालेल्या बदलाने मी ही आश्चर्यचकीत झालो.

आपल्या देशात बिना वाचता ज्या ग्रंथला जाळल्या जाते तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. मनुस्मृती, स्त्री, पुरुष, ब्राह्मण, शूद्र सर्वांना शिक्षणाचा अधिकार देते. गुरुकुलांत शिक्षण प्रारंभ करताना ब्रम्हचारी आणि ब्रम्हचारिणी सर्वांचा यज्ञोपवीत होत असे. सर्वांना स्नान संध्याचा अधिकार होता.  आज ही माझ्या माहीत प्रमाणे आर्यसमाज गुरुकुलांत आणि बाबा रामदेवच्या शाळांत सर्वांचा यज्ञोपवीत होतो. यू ट्यूब वर व्हिडिओ दिसतील. शिक्षणानंतर योग्यते अनुसार वर्ण ठरत असे. त्याकाळी ब्राम्हण कुळात जन्मलेला विद्यार्थी ही शूद्र होत असे आणि शूद्र ही ब्राम्हण होत होता. उदा. रत्नाकर ते वाल्मिकी, वैश्या पुत्र सत्यकाम जाबाली आणि महामुनी व्यास तर धीवर कन्येपासून विवाह बाहय संबंधातून उत्पन्न झाले होते. आपल्या संविधानात जाती जन्मानुसार आहे. आज शूद्र  ब्राम्हण बनू शकत नाही. मनुस्मृती शिक्षणात भेदभाव करत नाही. वयाच्या आठ वर्षांनंतर सर्व मुलांनी गुरुकुलात राहावे असा निर्देश मनुस्मृतीत आहे. बाल विवाहाचा ही निषेध मनुस्मृतीत आहे. रजस्वला झाल्यानंतर 36 महिन्यांनंतर अर्थात वयाच्या 16 वर्षांनंतरच  स्त्रीचा  विवाह झाला पाहिजे अशी व्यवस्था मनुने दिली आहे. विवाह पूर्वी स्त्रीचे शिक्षण पूर्ण होणे गरजेचे होते. मनुने विधवेला पुन्हा लग्न करण्याचा अधिकार दिला आहे. पुत्र प्राप्त करण्याचा अधिकार ही दिला आहे. महाभारतात तो कुंतीने वापरला ही आहे. मनुस्मृती तर एकाच अपराधासाठी शुद्राला सर्वात कमी दंड  (कारण तो बुद्धीने न्यून आहे), त्याच्या आठ पट जास्त वैश्याला, 32 पट जास्त क्षत्रियाला आणि 64 पट ब्राह्मणाला. राजाला तर सहस्त्र पट जास्त. इत्यादि इत्यादि. तो जिज्ञासु असल्याने मनुस्मृती वाचून त्याचा दृष्टीकोण बदलला. त्याचे विचार बदलले. 

बाकी मूर्ख माणसांना धान्यात असलेले तांदूळ, गहू दिसणार नाही. त्यांना फक्त कचरा, खडे, दगड इत्यादि दिसतात आणि ते सर्व धान्य उडवून लावतात. तसेच ग्रंथांना नावे ठेवणारे आणि ग्रंथांना जाळणारे असतात. बाकी दासबोधाच्या सुरुवातीलाच समर्थांनी म्हंटले आहे, ज्याचा मनात जैसा भाव,  तसेच फळ ग्रंथ वाचून मिळते.


Saturday, April 19, 2025

समर्थ विचार: तमोगुणी भक्ति म्हणजे जिवंतपणे नरक यातना भोगणे

मानवीय जीवनाचे उद्दीष्ट धर्म मार्गावर चालत अर्थार्जन करणे, त्या धनाचा उपयोग स्वतच्या परिवारसाठी आणि समाज कल्याणसाठी करणे, हळू-हळू भौतिक सुखांचा त्याग करत अध्यात्माची वाटचाल करून मोक्षाची प्राप्ती करणे. धर्म मार्गावर चालण्यासाठी स्वस्थ शरीर आणि मन पाहिजे. पुरुषार्थ करण्याची क्षमता पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगति करण्यासाठी नानाविध धार्मिक ग्रंथांचे श्रवण आणि मनन करावे लागते, उत्तम गुरूंकडून समजून घ्यावे लागते आणि आचरणात उतरवावे लागते. या साठी पुरुषार्थ हा करावाच लागतो.तेंव्हाच आध्यात्मिक क्षेत्रात साधकाची प्रगति होते. आध्यात्मिक मार्गावर चालण्यार्‍या साधकाला आत्मसंतोष रूपी स्वर्ग सुखाची प्राप्ती तर याच जीवनात  होते

पण माणूस स्वभावाने आळशी असेल तर तो कोणत्याही क्षेत्रात पुरुषार्थ करू शकत नाही. मग तो भौतिक आणि आध्यात्मिक जगात  प्रसिद्धीसाठी  सौपा आणि तामसिक मार्ग निवडतो. त्याला वाटते शरीराला कष्ट देणार्‍या तामसिक मार्गाचा अवलंबन करून या लोकात सहज स्वर्ग सुख भोगता येते आणि मोक्षाची प्राप्ती ही होते. 

समर्थांनी दासबोधातील दुसर्‍या दशकातील सहाव्या समासात भगवंताला प्रसन्न करण्यासाठी किंवा सिद्धी प्राप्त करण्यासाठी  शरीराला त्रास देण्याच्या प्रकारांचे वर्णन केले आहे. उदा. गळ टोचून घेणे, निखर्‍यावरून चालणे, जिभेला टोचून घेणे, देवतेले जीभ अर्पित करणे, डोक्यावर पेटलेल्या सरक्या ठेऊन चालणे, एक हात सदैव उंच ठेऊन वाळवून घेणे, स्वत:ला गळ्या पर्यन्त जमिनीत पुरून घेणे इत्यादि इत्यादि. काही तामसिक भक्त आपले शिर देवतेला अर्पित करून देतात तर काही देवाच्या दारी निराहार राहून प्राण त्याग करतात. अश्या तामसिक भक्तांना आत्महत्येचे पाप भोगावे लागते. नुकताच कुंभ मेला पूर्ण झाला. समर्थांनी वर्णन केलेले सर्व तामसिक प्रकार या मेळाव्यात  दिसले.   

अनेक महीने एक हात सतत उंच ठेवला तो वाळून जाईल. शरीराला कष्ट होईल. ईश्वराची प्राप्ती होणार नाही. देवतेला जीभ कापून अर्पित केल्याने साधक आयुष्यात कधीच बोलू शकणार नाही. याच प्रमाणे नाना प्रकारे शरीराला कष्ट दिल्याने साधकाला शारीरिक कष्ट होईल. जीवंतपणी नरक यातना सोसाव्या लागतील. ईश्वर प्राप्ती निश्चित होणार नाही. मोक्ष प्राप्तीचा प्रश्नच येत नाही. त्याला उदर निर्वाहासाठी काही काळ दान-दक्षिणा अवश्य मिळेल. अश्या अनेक तामसिक मार्गावर चालणार्‍या साधकांना काही काळानंतर पश्चाताप होतो. पण अधिकान्शांच्या बाबतीत वेळ निघून गेलेली असते. जीर्ण शरीर आणि मनाने पुरुषार्थ करणे ही शक्य होत नाही. उरलेल्या आयुष्यात फक्त नरक यातना त्यांच्या नशिबी येतात. 




 

Monday, April 14, 2025

स्वप्नाची टीम: दोन लघु कथा

 

फायनल मॅच होती. राजेशने मैदानात उतरताच पाहिल्याच ओवर मध्ये ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्‍या पहिल्या दोन चेंडूवर बेकफुट वर जाऊन ऑफ साईडला दोन चौकार मारले. या सीझनचे त्याचे पाचशे रन ही पूर्ण झाले. तिसरा चेंडू सरळ आला. राजेश आधीच बेकफुट वर गेला होता. त्याने त्या चेंडूला समोर मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बैटला लागला नाही. राजेश ने मागे वळून पाहिले आणि रागात बैट जमिनीवर पटकला. पण त्याच्या काही फायदा होणार नव्हता. त्याचा त्रिफळा उडालेला होता. राजेश आऊट झालेला होता. तो पेवेलियन मध्ये परतला. त्याच्या फ्रेंचाईसच्या मालकिणीने त्याच्या कडे पाहून थंब्स अप केले. राजेशने ही तिच्या कडे पाहत एक स्माईल दिले. 

रात्री बेडरूम मध्ये राजेश आपल्या बायकोला म्हणाला, राणी तुझ्या स्वप्नाचे फार्म हाऊस घेण्याची इच्छा आज मी पूर्ण केली. 

(2)

राजेशचा त्रिफळा उडाला आणि राजूने डोक्यावर हात मारला. राजू स्वत:ला बुद्धिमान समजत होता. लीग खेळणार्‍या सर्व खेळाडुंचे आंकडे त्याला माहीत होते. कोणता खेळाडू, कोणत्या गोलंदाजाविरुद्ध चांगला खेळतो, कोणत्या मैदानात चेंडू कसा येतो इत्यादींचे त्याने उत्तम रीतीने अध्ययन केले होते. त्याच आधारावर तो  दररोज स्वप्नील टीम बनवायचा. प्रत्येक मॅच संपल्यावर आपल्या चुका  शोधायचा. त्याने आकड्यांच्या आधारावर आजच्या फायनल मॅचसाठी स्वप्नील टीम निवडली होती. आज एक कोटी जिंकण्याची त्याला शंभर टक्के खात्री होती. मॅच संपला. निवडणूकीच्या सर्व्हे प्रमाणे त्याचे अंदाज या वेळी ही चुकले होते. या सीझन मध्ये कर्ज घेऊन त्याने लाखो रुपये स्वप्नील टीम वर खर्च केले होते. लोकांचे कर्ज कसे चुकविणार, बायको मुलांचे पोट कसे भरणार... या यक्ष प्रश्नांचे उत्तर त्याच्यापाशी नव्हते. न कळत त्याची पाऊले रेल्वे लाइनच्या दिशेने चालू लागली.....



Friday, April 11, 2025

काळाजी गरज: मेकाले नव्हे कौशल युक्त गुरुकुल शिक्षण पाहिजे

  


आजच्या शिक्षणाचे दोन वाक्यात वर्णन करता येते. पहिले वाक्य विषय पाठ करा. दुसरे वाक्य पाठ केलेले कागदावर लिहा किंवा टंकित करा. याचे एक उदाहरण एकदा एक मुनि  जंगलातून जात होते. मुनिला शिकारीच्या जाळ्यात अटकलेले काही पोपट दिसले. मुनिने पोपटांना जाळ्यातून मुक्त केले. मुनि ने विचार केला, आज मी या पोपटांना शिकार्‍याच्या जाळ्यातून मुक्त केले. पण भविष्यात पुन्हा हे पोपट जाळ्यात अटकू शकतात.   मुनिने शिकारी पासून सावधान राहण्यासाठी पोपटांकडून पाठ करून घेतले, शिकारी येणार, जाळे टाकणार, त्यावर दाणे टाकणार, आम्ही दाणे खाणार नाही, शिकारीच्या जाळ्यात अटकणार नाही. पोपटांना हे पाठ झाले याची खात्री झाल्यावर मुनि आपल्या मार्गाने निघून गेले. दुसर्‍या दिवशी शिकारीने पुन्हा जाळे  लावले, त्यावर दाणे टाकले. पोपट जाळ्याकडे पाहत जोरात बोलू लागले, शिकारी आला, जाळे टाकले, त्यावर दाणे टाकले, आम्ही दाणे खाणार नाही. असे ओरडत सर्व पोपट दाणे खाण्यासाठी जाळ्यावर उतरले. मुनिने पोपटांकडून पाठांतर करून घेतले होते पण प्रात्यक्षिक ज्ञान दिले नव्हते.   

आपल्या देशातील मैकाले शिक्षण व्यवस्थेत 90 टक्के शिक्षण यातच येते. सरकारी नौकरी सोडून कुठेही कौशल रहित  शिक्षणाचा उपयोग नाही. 21 वर्षे (18+3) वर्ष शिक्षण घेऊन ही अधिकान्श तरुणांसमोर पुढे काय कराचे हा भला प्रश्न चिन्ह असतो. कारण त्यांच्यापाशी कोणत्याही विषयाचे प्रात्यक्षिक ज्ञान नसते.  मग शिक्षण कसे असावे हा प्रश्न मनात येणार. याचे उत्तर अथर्ववेदात गुरुकुलात प्रवेश करताच विद्यार्थ्यांवर कोणते संस्कार केले पाहिजे यात सापडते.

आचार्य उपनयमानो ब्रह्मचारिणं कृणुते गर्भमन्तः

तं रात्रीस्तिस्र उदरे बिभर्ति तं जातं द्रष्टुमभिसंयन्ति देवाः

अथर्व० ११।५।३


शब्दार्थ : आचार्य उपनयन संस्कार करून शिष्याला गुरुकुलात प्रवेश देतो. ज्या प्रमाणे आई आपल्या उदरात गर्भाचे पोषण करते तसेच आचार्य तीन रात्री शिष्याचा सांभाळ करतो. त्यानंतर त्याचा पुन्हा जन्म होतो. त्या तेजस्वी ब्रह्मचारीला आशीर्वाद देण्यासाठी देवता/ विद्वान जन तिथे येतात.

इथे तीन रात्र हा शब्द महत्वपूर्ण आहे. रात्र म्हणजे अज्ञान. अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण. त्यासाठी तीन प्रकारचे ज्ञान प्राप्त करणे प्रत्येक विद्यार्थीला गरजेचे.  अज्ञानी ब्रम्हचारी हा पशु समान असतो. आचार्यचे पहिले कार्य आपल्या शिष्यावर उत्तम संस्कार करणे. विद्यार्थी, धैर्यवान, क्षमाशील, संयमी, शरीर आणि मन शुद्ध ठेवणारा, चोरी करणारा, असत्य बोलणारा, इंद्रियांवर नियंत्रण असलेला अर्थात हिंसा, द्वेष, लोभ, मोहांपासून दूर राहणारा, मानवीय गुणांनी संपन्न असा निर्मित झाला पाहिजे. अशक्त शिष्य ज्ञान प्राप्त करण्यात असमर्थ ठरतो. गुरुकुलांत ब्रम्हचारी  शारीरिक व्यायाम, योग, प्राणायाम कार्याचे. त्यांचे शरीर आणि मन दोन्ही सदृढ झाल्याने ज्ञान  प्राप्त करण्यासाठी  परिश्रम  ते करू शकत होते.  ज्ञान प्राप्ती नंतर  पुरुषार्थ करून धर्म मार्गावर चालत अर्थ अर्जित करून, संसारीक भोग भोगून, मोक्षाच्या वाटेवर चालण्याची क्षमता निर्मित करणे ही गुरूचे कार्य. गुरुकुलातून ज्ञान प्राप्त करून बाहेर पडणार्‍या विद्यार्थ्यांना सर्व साधुवाद देतीलच.  याचे उदाहरण, वैदिक गुरुकुलात शिकलेले स्वामी रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण आपल्या समोर प्रत्यक्ष आहेत.

गांधीवादी लेखक धर्मपाल यांनी मेकाले पूर्व भारतीय शिक्षण व्यवस्था कशी होती त्यांचा उल्लेख आपल्या "रमणीय वृक्ष' (The Beautiful Tree) या पुस्तकात केला आहे. यात विलियम अडम्स, जी.डब्लू लिटणर सहित अनेक ब्रिटीश अधिकार्यांनी १८२० ते १८४० च्या कालखंडात पंजाब, मुंबई, बिहार, ओडिशा आणि चेन्नई प्रांतात केलेले भारतीय शिक्षणाचे दस्तावेज आहेत. या दस्तावेजानुसार काही निष्कर्ष मी काढण्याचा प्रयत्न केला.

शिक्षण सर्व जातीतल्या मुलांसाठी खुले होते. मद्रास प्रांतात तिन्नेवेली जिल्ह्यात शुद्रांची संख्या ८४ टक्के तर, सेलम मध्ये ७०टक्के होती.  ब्राम्हणांची मुले ते ६व्या वर्षी तर शुद्रांची ते वर्ष झाल्यावर शिक्षण सुरू करायची. प्राथमिक शिक्षण ज्यात विद्यार्थी  स्थानीय भाषा, गणित, गो पालन, कृषि आणि त्या वेळचे सामान्य ज्ञान प्राप्त करायचे. आजच्या हिशोबाने वी पास झाल्यानंतर विभिन्न प्रकारचे कौशल धातू विद्या, लोह, तांबा पितळ, स्वर्ण इत्यादी. लाकडाचे कार्य, दगडावर शिल्प, तलावांची निर्मिती, स्थापत्य कला, साबण निर्मिती, विभिन्न प्रकारच्या वस्त्रांची निर्मिती, इत्यादी इत्यादि. या शिवाय व्याकरण, तर्कशास्त्र, न्यायशास्त्र आयुर्वेद आणि  औषधी निर्मिती, सांख्य, साहित्य, तंत्र शास्त्र ही शिकवल्या जात असे. शिष्याला विषय100 टक्के आत्मसात झाल्या शिवाय त्याचे शिक्षण पूर्ण होत नसे. गुरुकुलांत शिक्षणाचा उद्देश्य विद्येचा व्यावहारिक पक्ष ही शिष्याने आत्मसात केला पाहिजे हा होता. त्या विषयाच्या विद्वानांकडून प्रात्यक्षिक ज्ञान  विद्यार्थी घेत असे. एक विद्यार्थी 8 वर्षांत ज्ञान प्राप्त करत असे तर दुसर्‍याला 16 वर्ष ही लगायचे१८२५ मध्ये चेन्नई प्रांतात ,५०,००० विध्यार्थी शिक्षा ग्रहण करायचे इंग्लेंड पेक्षा दुप्पट.बिहार आणि बंगाल मध्ये लाख गुरुकुल होते. १०० उच्च शिक्षा देणारे संस्था होत्या. वस्त्र, भोजन, निवारा इत्यादी सुविधा स्थानिक गावातील लोक पुरवायचे. अधिकांश शिक्षक ब्राह्मण कायस्थ असले तरी ३० जातींचे शिक्षक होते. वर्धमान जिल्ह्यात सहा शिक्षक त्याकाळी सर्वात  अंत्यज  समजणार्‍या चांडाळ जातीचे होते. दक्षिणेत ब्राम्हणेतर शिक्षकांची संख्या ७० टक्के पेक्षा जास्त होती. 

त्याकाळी अस्पृश्यता असली तरी शिक्षणाचे दरवाजे सर्वांना खुले होते. मलबार जिल्ह्यात वैद्यक शास्त्र शिकणाऱ्या १९४ विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के शूद्र  होते. फक्त ३१ ब्राह्मण होते. तर खगोल शास्त्र शिकणाऱ्या ८०० पैकी फक्त १३१ ब्राम्हण होते. स्त्री शिक्षणाचे म्हणाल तर, ब्राम्हण मुली ३७ टक्के तर वैश्य शूद्र इत्यादी ११ ते १९ टक्के. त्याकाळी भारतात बहुतेक जगात सर्वात जास्त स्त्री शिक्षण होते. याचा अर्थ 1857 आधी जगात सर्वात जास्त साक्षरता भारतात  होती. 

1857 नंतर ब्रिटीशांना, फूट डालो आणि राज करो नीती राबवून जाती-जातीत वैमनस्य वाढविण्यासाठी खोटे प्रतीक आणि खोटा इतिहास जनतेच्या मनात रुजविणे गरजेचे होते. जुनी पाटी पुसल्या शिवाय नवे प्रतीक मनावर ठसवले जाऊ शकत नाही हे ब्रिटीशांना माहीत होते. त्यासाठी सर्व प्रथम भारतातील शिक्षण संस्थान नष्ट करण्याची गरज होती.  आपल्या शक्तीच्या जोरावर गुरुकुलांची आर्थिक नाळ कापून टाकली. सर्व गुरुकुलांना समाप्त केले. गावो-गावी असलेले 6 लाख गुरुकुल समाप्त झाले.  पुढील दोन पिढीत, अर्थात 50 वर्षांत, देशाची अधिकान्श जनता साक्षर पासून निरक्षर झाली. ब्रिटीशांना फक्त सरकारी कर्मचारी हवे होते  म्हणून  शाळा जास्त उघडल्या नाही. ज्या उघडल्या त्या ही मोठ्या शहरांमध्ये.  याचा सर्वात जास्त फटका आजच्या भाषेत म्हणाल तर ओबीसी आणि दलित समुदायला बसला. 90 टक्के दलित समुदाय निरक्षर झाला. ब्रिटीशांनी प्रचार माध्यम आणि खोट्या इतिहासाच्या माध्यमातून यासाठी उच्च वर्गाला जवाबदार ठरविले. उत्तर भारतात शिक्षण नष्ट झाले. थोड्या बहुत ब्राम्हण आणि वैश्य जनतेला घरात किमान साक्षर होण्याचे शिक्षण मिळत होते. फक्त दक्षिण भारतात, काही गुरुकुल विपरीत परिस्थितीत जिवंत राहिली. त्यामुळे वेदांचे आणि आयुर्वेदाचे ज्ञान वाचले. आपले ज्ञान नष्ट झाल्याचे एक उदाहरण-  पाणीदार शहरांचा, गावांचा आणि घरांचा निर्माण करण्याची विद्या जवळपास नष्ट झाली. मी जुन्या दिल्लीत ज्या वाड्यात राहत होतो तिथे पावसाचे सर्व पाणी बेड्यात (आंगणात) पडायचे. (आयताकार वाड्याच्या मध्यभागी बेडा होता). 30 फुट खोल असलेल्या हेंडपंपचे पाणी गोड असायचे. 150 पूर्वी पाण्याच्या दृष्टीने आत्मनिर्भर घरांची आणि नगरांची निर्मिती व्हायची. 1947 मध्ये दिल्लीची जनसंख्या 4 लक्ष होती आणि 500 वर तलाव होते.  आजच्या वास्तुविदांना हे ज्ञान नाही. गुरुकुल शिक्षण मेकाले शिक्षणपेक्षा जास्त उत्तम आणि व्यावहारिक होते, हे कळते.  

ईस्ट इंडिया कंपनीच्या सर्वेक्षणानुसार साक्षर भारतीयांना निरक्षर बनविण्याचे कार्य ब्रिटीशांनी मेकाले शिक्षण लादून केले.   आज जे स्वत:ला मागास म्हणवितात, अश्या जनतेला ब्रिटीशांनी निरक्षर आणि मागास  बनविले  हे ही कळते. 

भारताला स्वात्यंत्र मिळून 75 वर्ष झाली. अजूनही देशात मेकाले शिक्षण सुरू आहे. आज ही 18 वर्षाचा युवा कौशलहीन असतो. प्राचीन गुरुकुल पद्धतीच्या उत्तम बाबी नवीन शिक्षण  व्यवस्थेत घेण्याचे गरजेचे आहे. आठवी नंतर 100 टक्के विद्यार्थ्यांना कौशल युक्त शिक्षण अनिवार्य करणे काळाजी गरज आहे.  बिना प्रात्यक्षिक शिक्षण देता स्नातक निर्माण करणे म्हणजे अशिक्षित बेरोजगार पैदा करणे.