Saturday, December 10, 2011

'युगधर्म'


निवडूक जिंकण्यासाठी आजचे नेता कुठल्याही थरावर जातात. कालपर्यंत जे विरोधी होते ते निवडणूक जवळ आल्यावर मित्र बनतात. आज धर्मयुद्ध म्हणजे सत्तेसाठी युद्ध! आता विचार करा जर महाभारताच्या वेळी भारतात प्रजातंत्र असते आणि दुर्योधनाच्या सभेत लाखोंची भीड असती तर त्या वेळी 'आजच्या कृष्णाने' आजच्या अर्जुनास काय उपदेश दिला असता?

'युगधर्म'

पाहुनी लाखोंची भीड़ 
दुर्योधनाच्या सभेत

संभ्रमि अर्जुनाने विचारले 
'योगेश्वर' माझा 'धर्म' काय? 

कृष्णाने हाकली 'मर्सडीज'
पोहोचला दुर्योधनाच्या 'तंबूत' 

आणि वदला: 
'पार्थ' हाच आहे आजचा 
'युगधर्म'.

No comments:

Post a Comment