Wednesday, March 30, 2016

मार्ग मुक्तिचा



तहानलेली नदी
पाण्याच्या शोधात 
भटकत होती
भयाण वाळवंटात.

उडणार्या गिधाडास
विचारले तिने
भाऊ मिळेल का कुठे
जीवनदायी पाणी.

पाण्याचे विचारू नको
सापडेल तुला पुढे
ताई मार्ग मुक्तिचा.

एका वळणावर
नदीने पहिले
शुष्क वडाच्या फांदीवर
लटकलेले होते एक प्रेत.

झाडाखाली साचलेला होता
एक ढीग मोठा कवट्यांचा
खेळत होती त्यांच्या सवे
गिधाडांची गोंडस पोरे
फुटबॉल फुटबॉल.

टीप: कवितेचा अर्थ शोधण्यास वाचक स्वतंत्र आहे.

Saturday, March 26, 2016

बडबड गीत - पंखा मेरा दोस्त



आमची छकुली आता ४० दिवसाची झाली. आजकाल तिला नवीन छंद लागला आहे. पंखा सुरु झाला कि ति पंख्याकडे पहात राहते, उगाचच आपल्या मनात हसते. कडे वर घेतले तरी तिच्या नजरा पंख्यावारच टिकलेल्या असतात. पंख बंद करताच तिचा सायरन सुरु होतो. झक मारून पुन्हा पंखा सुरु करावा लागतो. कधी कधी विचार येतो पंख्याला पाहून तिच्या मनात काय विचार येत असतील.

पंखा मेरा दोस्त
पण  बोलतच नाही.

फिरू फिरू करतो
घुमू घुमू करतो
घूं घूं करूत तो
नुसताच फिरतो.

हातवारे करते किती
स्माईली-स्माईली देते
गाढव लेकाला पण
काही कळतच नाही.
मला पाहून तो
हसतच नाही.

पंखा मेरा दोस्त
पण बोलतच नाही.

Thursday, March 24, 2016

मेट्रो प्रवासात : मनुस्मृति वर चर्चा - ब्राह्मण आणि शुद्र


आपल्या देशातल्या एका मोठ्या प्रसिद्ध विश्वविद्यालय जेथून समाजात बदल घड्विनारे अनेक  बुद्धिमंद तैयार होतात. तेथील विद्यार्थांनी मनुस्मृति जाळली. तेथे उपस्थित असलेल्या अधिकांश विद्यार्थांनी मनुस्मृति कधी वाचली हि नसेल. मनुस्मृति जाळण्याचे कारण काय बरे असेल. विद्यार्थांच्यामते शूद्रांचे शोषण करण्यासाठी ब्राह्मणांनी लिहिलेला ग्रंथ अश्यारीतीची  काही त्रोटक माहितीच या ग्रंथा बाबत विद्यार्थांना असेल. कदाचित त्या वरून त्यांनी मनुस्मृति जाळण्यातचे ठरविले असेल किंवा कुणी आपल्या स्वार्थासाठी त्यांचा वापर केला असेल.
 
जिथे मनुष्यच परिपूर्ण नाही तिथे मनुष्याने लिहिलेला कुठला हि ग्रंथ परिपूर्ण राहू शकत नाही.  बाबासाहेबांनी लिहिलेल्या आपल्या संविधानात हि आपल्याला संशोधन करावेच लागतात.  तसेच मनुस्मृति हि परिपूर्ण नाही.  

मनुस्मृति हा फार जुना ग्रन्थ आहे. बहुतेक श्रुति-स्मृतिच्या काळात मनुस्मृतिची रचना सुरु झाली असेल आणि गेल्या ३००-४०० वर्षांआधी पर्यंत होत राहिली असेल. अनेक  सुलेखक आणि स्वत:ला न्याय आणि धर्मशास्त्रात पारंगत समजणार्यांनी यात आपले योगदान दिले असेल. काळाप्रमाणे अनेक नवीन विचारांना (चांगले आणि वाईट)  मनुस्मृतित स्थान मिळाले असेल.  तरीही इतर प्राचीन धर्मग्रन्थ आणि न्याय शास्त्रातील  ग्रंथांकडे पाहिले तर मनुस्मृति ही उजवीच ठरेल. 

हा लेख लिहिण्याचे कारण असे,  कालच कार्यालयातून घरी येताना मेट्रोत ३-४ तरुण  विद्यार्थी भेटले. त्यांनी मला बसायला जागा हि दिली (दिल्लीत याला एडजष्ट करणे असे हि म्हणतात). मनुस्मृतिचा विषय निघाला ब्राह्मणांनी शूद्रांना छळण्यासाठी मनुस्मृतिची निर्मिती केली आहे, अशी या विद्यार्थांची धारणा.  मी त्यांना विचारले तुम्ही मनुस्मृति वाचली आहे का? अपेक्षेप्रमाणे नाही हे उत्तर आले.  पण त्यांना परमेश्वराने ब्राह्मण आणी शुद्र यांची निर्मिती कशी केली या बाबत थोडी माहिती होती.  माहितीचा आधार ब्राह्मण द्वेष हाच होता.  एका जवळ टेबलेट होती. मी त्याला मनुस्मृतिनुसार शुद्र आणि ब्राह्मण कोण याची माहिती काढायला सांगितली. मी हि माहिती सांगू शकत होतो. पण म्हणतात ना “हात कंगन को आरसी क्या, पढ़े लिखे को फारसी क्या”. मनुस्मृतितील अणि इतर ग्रंथातील काही  मन्त्र अर्थांसकट त्याना सापडले. पुढील १५-१६ मिनिटे आमची यावर चर्चा झाली. आपल्या परीने त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. 

शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम।
क्षत्रियाज्जातमेवं तु विद्याद्वैश्यात्तथैव च।
(10/65

महर्षि मनुच्या अनुसार कर्मानुसार व्यक्ती ब्राह्मण, क्षत्रिय वैश्य आणि शुद्र म्हणून ओळखला जातो. विद्या आणि योग्यततानुसार एका वर्णातला व्यक्ती दुसर्या वर्णात जातो. कर्मानुसार सत्यकाम जाबाली आणि विश्वामित्र ब्राह्मणत्वला प्राप्त झाले आणि इक्ष्वाकु वंशातला एक राजा कल्माषपाद वर्ण व्यवस्था बाहेर राक्षस  म्हणून ओळखला गेला. पण हि वर्णव्यवस्था आली कुठून. यावर शोध घेताना त्या विद्यार्थांना हा मन्त्र सापडला.

ब्राह्मणोंSस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः.
ऊरु  तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत.

(यजुर्वेद: ३१/११)

या मंत्रात परमात्म्याच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, उरातून वैश्य आणि पायातून शुद्र यांची निर्मिती झाली आहे. 
 
ब्राह्मण मुखातून उत्पन्न झाला याचा अर्थ काय. जुन्याकाळात गुरुकुलात आचार्याच्या मुखातून निघालेली वाणी अर्थात प्रवचन ऐकून विध्यार्थी शिकायचे. 

अथाधिविद्यम. आचार्यःपूर्वरूपम. अंतेवास्युत्तर रूपम्.
विद्या संधि:. प्रवचन संधानम. इत्यधिविद्यम्.

(तैत्तिरीय उपनिषद ३/४)

त्या काळी विद्वान आणि वेदशास्त्र संपन्न  व्यक्तीला समाजात ब्राह्मणाचा दर्जा मिळायचा.  आज हि आपण विद्वान माणसाचा समोर पंडित हि विरुदावली लावतोच. 

क्षत्रियाचा जन्म बाहूतून. ज्या व्यक्तीचे बाहू मजबूत असेल, तोच सुरक्षा देऊ शकतो. हे त्रिकाल सत्य आहे. आज हि मजबूत, स्वस्थ्य लोक सेन्यात किंवा इतर सुरक्षा दलात जातात.
 
वैश्यचा  जन्म जंघेतून झाला.  ज्या माणसाच्या उरू अर्थात जंघा मजबूत असेल तो अविरत मेहनत करू शकतो. असा व्यक्ती थोडे बहुत पारंपारिक ज्ञान असेल तर शेतीबाडी, पशुपालन, व्यापार, उद्योग धंधा  उत्तम रीतीने करू शकतो. अश्या व्यक्तींना वैश्य म्हणून संबोधित केले आहे.
 
शुद्र हा परमेश्वराच्या पायातून उत्पन्न झाला.  ज्ञानहीन आणि शक्तिहीन व्यक्ती ही दुसर्यांची सेवा करून पोट भरू शकतो. सरकार दरबारातील चपरासी, दरबान  किंवा जुन्या काळात राज दरबारातील सेवक, साफ सफाई, झाडू-पोंछा, इतर घरगुती अणि छोटे मोटे कामे करणार्यांना शुद्र म्हणून संबोधित केले आहे. 

आपण मंदिरात परमेश्वराच्या पायांवर डोके ठेवतो. कारण परमेश्वर आपली सेवा करून आपले दुःख दूर करतो. त्याचाच  चरणांपासून उत्पन्न झालेले, आपली सेवा करणारे (शुद्र) मग ते कुठल्या ही  जातीचे का असेना. श्रेष्ठच आहेत. मनुस्मृतितल्या या मंत्रानुसार जन्मापासून कुणीच शुद्र किंवा ब्राह्मण नाही आहे. कर्मानुसारच माणसाची जात ठरते.

हे सर्व मनुस्मृतित लिहिले आहे, या वर त्यांचा विश्वास बसायला वेळ लागला. पण गुगल गुरु  खोटे बोलत नाही यावर त्यांचा विश्वास होता.  शिवाय हे मंत्र त्यांनीच शोधलेले होते. प. जनकपुरीच्या मेट्रो स्टेशन वर ते सर्व उतरले. उतरताना त्यातला एकाने म्हंटले, अंकल  अभी तक हमें टीवी से ही अपने धर्म के बारे में आधी अधूरी थोड़ी बहुत जानकारी थी. कभी भी हमने अपने धर्मग्रंथो को नहीं पढ़ा. पर अब एकबार मनुस्मृति  पढ़कर जरुर देखूंगा. मी हि हसून त्यांना धन्यवाद दिला. निश्चितच आजपासून आपल्या  पुरातन पुस्तकांबाबत त्यांची धारणा थोडी तरी बदलली असेलच. 

Saturday, March 19, 2016

यमुनाकाठी दैवीय शांती यज्ञ आणि आसुरी अहिष्णुता



द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर  दैवीय प्रेरणेने  सर्व पंथीय धार्मिक  नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे  देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते.  या  सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्य अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. विद्वान धार्मिक लोक ज्याला वेग वेगळ्या स्वरूपात ओळखत असले तरी  तो एकच आहे. प्रेम आणि शांती हीच परमेश्वराची खरी आराधना. कदाचित कलयुगात असा दैवीय अनुभव लोकांना प्रथमच अनुभवला असेल. १५५ देशातल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेनी शांती आणि प्रेमाचा ह्या  यज्ञात आपली आहुती टाकली. जगभर श्रीश्रींचा प्रेम आणि शांतीचा संदेश पसरविण्याचा प्रण केला.

केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, जगाला पुढे नेण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे प्रेम आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग.  काही राजप्रतिनिधीनीं प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा संमेलन श्रीश्रीनी  त्यांच्या देशात भरवावे अशी इच्छा हि व्यक्त केली. जगभरातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन या विशाल मंचावरून सर्वांनाच घडले. भिन्न असलो तरी आपण एकच आहोत हि भावना लोकांच्या मनात रुजुविण्यात या संमेलनाला यश आलेतच.  सर्व विश्व एक मोठे घरच आहे, या वेद्वाक्याची प्रचीती हि आलीच. इथे नमूद करणे जरुरी आहे, पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.

शांती आणि प्रेमाचा प्रसार करणारा हा यज्ञ रक्तपिपासू आसुरी शक्तींना कसा आवडणार. आमचाच मार्ग सत्य आणि सर्वानींच तोच मार्ग स्वीकारावा असे म्हणविणार्या IS, अलकायदाचे प्रतिनिधी तिथे आले नव्हते. सतत क्रांतीचा जयघोष करणारे, दुसर्यांचा विनाश चिंतणारे, आमच्या शिवाय सर्वच मूर्ख असे म्हणविणारे,  रावणा समान बुद्धिमान, आधुनिक वेदज्ञाता, पुरोगामी, बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती. त्यांना ह्यातही हिंदू धर्माचे षड्यंत्र दिसले. शिवाय जगातील  लोक जर शांतीने राहू लागले तर क्रांती कुणाच्या  विरोधात करणार, कुणाचा विनाश चिंतणार. चांगल्या गोष्टींचा विरोध आणि दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची  परंपराच आहे. त्यात नवल काहीच नाही.

या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजी करणार होते आणि समापन अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. एका मुळे, राजकुमाराला देशाची गादी मिळाली नाही आणि दुसर्याने दिल्लीत कांग्रेसला धुळीस मिळविले. साहजिकच आहे जिथे मोदी तिथे अहिष्णुता हि आलीच, संमेलनात मोदीजीना महत्व दिल्या जात आहे, हे पाहून राणी साहेबांच्या अंगाची लाही-लाही होणारच होती.  प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा हा दैवीय यज्ञ उध्वस्त झालाच पाहिजे असे तिला वाटणे साहजिकच होते. ज्या कार्यक्रमाला दिल्ली प्रदूषण नियमायक मंडळाने अनुमती दिलेली होती.  श्रीश्रींचे भक्त असलेले अनेक कांग्रेसी नेते हि कार्यक्रमाला सहयोग देत होते. गेल्या सहा महिन्यापासून तिथे काम सुरु होते.  कचर्याने भरलेली जागा स्वच्छ करण्यात आली होती, विशाल मंच बांधण्याचे काम हि ४-५ महिने आधी सुरु झाले होते. कुणाचाच विरोध नव्हता. पण राणी साहेबांच्या कपाळावर आठ्या पाहून सर्व नमकहलाल पत्रकार, नेता, RTI कार्यकर्ता मैदानात उतरले. कार्यक्रमाचा जोरदार विरोध सुरु झाला. ज्या NGTला दिल्लीतल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या कारखान्यातून निघणार्या रासायनिक कचरा कधीच दिसला नाही. किंवा यमुनाच्या काठावर घरकुल उभारणारे बांग्ला देशीय हि दिसले नाही. ती NGT कुंभकर्णा प्रमाणे झोपेतून जागी झाली.  पण प्रत्यक्ष  राजाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कार्यक्रमाला उध्वस्त करणे NGTला शक्य नव्हते. ५ कोटींचा रुपयांचा जजीया लाऊन कार्यक्रमाला अनुमती दिली (असे अनेकांचे म्हणणे आहे).

शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा  संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला.  बाकी बाबू मोशाय यांना सर्व जगातील लोकांना ‘आम्ही तुमाके भाले-भाषी म्हणायचे असेल, पण  त्यांची ती इच्छा मनातच राहिली असेल.   असो.



Sunday, March 6, 2016

दंगा कथा - छोटे शैतान - एक अनुभव


मला आठवते तो ऑगस्टचा महिना होता. त्या दिवशी रविवार होता. रविवारी चांदनी चौक बंद राहत असले तरी लालकुआँ या परिसरातील सर्व दुकाने उघडी होती. चांदनी चांदनी चौक बाजाराच्या मागच्या बाजूला एक रस्ता हौजकाजी पर्यंत जातो. त्या भागाला लालकुआँ असे म्हणतात. ऑगस्टचा महिना हा दिल्लीत पतंगबाजीचा मौसम.  लालकुआँ हा बाजार पतंग आणि मांजा साठी  संपूर्ण  दिल्लीत प्रसिद्ध होता. गोटूला मांजाच्या  काही चरख्या  विकत घ्यायच्या  होता. मांज्याच्या १०० गजाच्या एका चरखीत १२५  गज मांजा असतो. १५-२०  गज सुट्टा मांजा  विकून त्याला काही पैसा कमवायचा होता. गोटू चा उल्लेख मागे हि एका गोष्टीत केला होता. (एक आठवण - गोटू आणि क्रिकेटचा चेंडू)

सकाळची ११ एक वाजले असतील, आम्ही दोघेही लालकुआँच्या बाजारात पोहचलो. भरपूर भीड होती. का आणि कुणास ठाऊक अचानक दगडफेक सुरु झाली. दंगा हो गया एकच ओरड सुरु झाली. होणारी दगडफेक पाहून आम्ही जाम घाबरलो.  तेथून पळ काढला. मुख्य रस्ता सोडून आम्ही एका नागमोड्या अरुंद गल्लीत शिरलो. हि गल्ली थेट चांदनी चौकला निघत होती.  गल्ली अरुंद अर्थात ७-8 फूट रुंद असली तरी सर्व घरे ५०-६० फूट एक सारखे उंच.  गल्लीत काही पाऊले पुढे गेलो असूच कि अचानक दोन-चार दगड आमच्या पुढ्यात येऊन पडली, थोडक्यात बचावलो. हळूच मान वरून बघितले, ११-१२ वर्षांची २ मुले  दगडांचा वर्षाव करीत होती. आम्ही बघतो आहे, हे पाहताच ती मुले गच्चीच्या कठड्या पासून दूर पळाली. हरामखोर, शैतान म्हणून गोटूने जोरदार शिवी दिली. पण  तिथे थांबून, त्या घरात शिरून, जाब विचारण्याची हिम्मत नव्हतीच. जीव मुठीत घेऊन पळत- पळत ४-५ मिनिटांत आम्ही दोघे चांदनी चौकला पोहचलो. इथे सर्व काही शांत होते. मागे लाल कुआँच्या भागात काय सुरु आहे,  कुणालाही  माहित हि नसेल. १२-१३ वर्षांचे  असलो तरी थोडी अक्कल  होतीच. दोघांनी आज काय घडले कुणाला सांगायचे नाही हे ठरवले. (घरी सांगितले असते तर वडिलांनी आधी जाब विचारला असता, एवढ्या दूर उनाडकी करायला  कुणी सांगितले होते. शिवाय चांगली धुलाई पण झालीच  असती).  गोटूला त्या छोट्या शैतानांचा भयंकर राग आलेला होता. त्या शैतानांची माहिती काढून त्यांना अद्दल घडविण्याचा त्यांनी निश्चय केला होता.

२-३ आठवड्यानंतर गोटू पुन्हा भेटला. त्याला विचारले, काही पत्ता लागला का? कोण होते ते छोटे शैतान. गोटू म्हणाला गेल्या रविवारी त्या गल्लीत गेलो होतो. पण घर ओळखता आले नाही. कदाचित मी त्या वेळी जाम घाबरलो होतो. अश्या परिस्थितीत कुठे लक्ष्यात राहणार, कुठल्या घराच्या गच्ची वरून दगडफेक झाली होती.  पण एक गोष्ट कळली. त्या गल्लीत कुणाचे तरी डोके फुटले होते. पोलीस त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती. थोडक्यात बचावला म्हणे. बाद में पुलिस गली के कुछ बदमाश लौंडों को पकड़ कर थाने ले गयी.  मी अडन्यासारखे विचारले, आपल्याला खर काय ते माहित आहे, पोलिसांना सांगितले पाहिजे. तो हसत म्हणाला, मूरख पोलीस आधी विचारतील तुम वहां क्या कर रहे थे, चक्की  पीसनी पडेगी, समझे क्या? पण ज्यांना पकडले त्यांचे काय झाले. होना क्या था, पुरा मोहल्ला पहुँच गया था, थाने में. पुलिसने अच्छी-खासी धुलाई की उन बदमाशों लौंडों की. मग मिस्किलपणे माझ्या कड़े बघत म्हणाला, बाद में दक्सिना लेके छोड़ दिया, पंडितजी. वैसे भी पंडतो और पुलिस में ज्यादा फर्क नहीं है. (मी ब्राह्मण आहे, त्याला चांगलेच माहित होते, फिरकी घेण्याचा मौका का सोडणार).

दंगे धोप्यांच्या अधिकांश घटनांमध्ये सुक्या बरोबर ओल आज हि जळते. पण त्या वेळी पोलीस ठाण्यातच अधिकांश मामल्यांचा निपटारा होत असे. क्वचितच मुकदमेंबाजीची नौबत यायची.  कारण त्या वेळी आज सारखा मिडीया नव्हता किंवा तिळाचे ताड करायची पद्धत हि नव्हती. छोट्या-छोट्या घटनांचा  राजनीतिक फायदा घेण्याची प्रवृत्ती हि नव्हती. 

बाकी गच्चीवरून खाली दगड फेकण्याचा परिणाम काय असतो, त्या छोट्या शैतानांना माहित हि नसेल. लोक दगडफेक करतात आहे, म्हणून त्यांनी हि दगडफेक केली असेल. पण एवढ्या वर्षांनतर आज हि त्या दिवसाची आठवण आली कि अंगावर काटे उभे राहतातच.