Wednesday, April 29, 2015

सावधान! मगरमच्छी अश्रू



सावधान मत्स्य पुत्रानों  आयुष्यभर   मासे मारणारा बगळा आता  मगरीचे रूप घेऊन अश्रू   ढाळण्यासाठी येत आहे, त्याला अचानक मत्स्य पुत्रांचा पुळका कसा आला, काही एक कळत नाही.



आयुष्यभर बगळ्याने 
मासे  सारे फस्त केले .
 घेऊनी वेश मगराचा.
ढाळतो अश्रू आता.

एका महानगरात एका मत्स्य पुत्राचा असाच जीव गेला:


भुलूनी मगर अश्रुना 
जीव गेला मत्स्याचा.

अर्पिली गांधी "चित्रफुले"
ढाळूनी अश्रू मगरीने.

सावधान! मत्स्य पुत्रानों

घेउनी वेश साधूचा 
रावण  हरतो सीतेला.
जाणीव ठेवा इतिहासाची 
भुलू नका मगर अश्रुना.






  






Sunday, April 26, 2015

एका नाटकाचा दुर्दैवी अंत

जवळपास ३० एक वर्षांपूर्वीची गोष्ट.  हौशी कलाकार मंडळीचे नाटक मंचावर सुरु होते. बैठीकीच्या खोलीचे दृश्य होते. मंचावर सोफासेट, सेंटर टेबल इत्यादी वस्तू होत्या.   अभिनयात दंग असलेला नायकाचा पाय कुठल्या तरी वस्तुत अटकला  आणि तो  धाडकन  सेंटर टेबल वर आपटला.  कपाळावर  चार टाके आले, अर्थातच नाटक अर्ध्यावरच संपले.  मंडळी हौशी होती,  तालिमी करताना मंचावर ठेवलेल्या वस्तूंचा विचार केला नव्हता.  जर तो विचार केला असता, तर नाटक अर्ध्यावर संपले नसते.

सिनेमात आपण पहिले आहे, दुष्ट खलनायक, नायकांच्या आप्तांना अधिकांश वेळी नायिकेला फासावर  लटकवतो, नायिका तडफडू लागते. नायक येतो, खलनायकाला यमसदनी पाठवितो, आणि फासावर लटकलेल्या नायिकेला सोडवितो. सिनेमात कित्येक मिनिटे फासावर लटकलेली नायिका जिवंत राहते. 

आपले राजनैतिक हित साधण्यासाठी, दिल्लीच्या नौटंकी बाज पार्टीला शेतकर्यांचा पुळका आला.   नौटंकी सुरु झाली. राजनीतिक महत्वाकांशा असलेल्या एक व्यक्ती झाडू घेऊन झाडावर चढला त्याच्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव दिसत नव्हता. त्या आधी त्यांनी घरच्यांना ही फोन केला होता. बहुतेक नौटंकी सुरु झाली हेच सांगितले असेल.  आपल्याला काही होणार नाही याची त्याला खात्री होती. जोरदार नारे बाजी करत  त्याने गळफास लावला,  कार्यकर्ता टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देत होते.  सावधानी म्हणून त्याने,  दोन्ही हातानी झाडाच्या फांदीला पकडून ठेवले, होते. ब्रेकिंग न्यूज मिडीयाने या दृश्याचे चित्रीकरण सुरु केले.  मंचावर बसलेल्या नौटंकीचे सूत्रधार ही यावर  बारीक लक्ष ठेवून होते. आता हा मनुष्य फासावर लटकेल.  आपण शेतकरी (?) फासावर लटकला याचा दोष सत्ताधारी पार्टीवर लाऊ, आपल्या कार्यकर्तानां  त्याला वाचविण्याची विनंती करू. नंतर त्या माणसाला जिवंत शहीदचा दर्जा देऊ. राजस्थान मध्ये त्याच्या मार्फत आपल्या पार्टीला पुढे वाढवू. बहुतेक त्याला ही तिकिटाचे आश्वासन दिले असेल.

नौटंकीची तैयारी व्यवस्थित होती. सर्व मना प्रमाणे घडत होत. पण एक तकनिकी चूक राहून गेली, हे कुणाच्याच लक्ष्यात आले नाही.    गळफास  या विषयावर   तज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतला नव्हता. जर घेतला असता तर नाटकाचा योग्य परिणाम साधला असता.  या घोड्चुकी मुळे  एका अति आत्मविश्वासी आणि महत्वाकांशी व्यक्तीचा  दुर्दैवी अंत झाला.

आता या  फसलेल्या नौटंकीच्या सूत्रधारांच्या विरुद्ध काही कार्रवाई  होईल का? हाच यक्ष प्रश्न आहे.

Sunday, April 12, 2015

गौ. हत्या बंदी (मांसाहार आणि भूक )





एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥

ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल.  (मनुस्मृति- 5:55)



वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ हत्येचे फळे आज  मानव समाज भोगत आहे.

महाराष्ट्रात गौ हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अतिशहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौमांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ बंदी असल्यामुळे गौमांस १५०-२०० रु किलोच्या हिशोबाने मिळते. दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि शेती साठी अनुपयुक्त बैल विकल्या जातात. पण संपूर्ण देशात गौहत्या बंदी उठल्यावर काय होईल, याची कल्पना देतो. अर्थातच  धार्मिक भावनांना महत्व न देता शुद्ध व्यवसायिक आधारावर विवेचन.

गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल. देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील  ज्या प्रमाणे जर्सी गायींच्या आयातीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देतात तसेच, मांस निर्यातीच्या धन्ध्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिक मांस देणाऱ्या गाईंचा आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देईल. सध्या ही गौमांस निर्यातीसाठी अनुदान दिले जाते.  या  गायी  गावात मिळणारे शिळे अन्न, भाजीचा व अन्य कचर्या वर जगणार  नाही. त्यांना अन्न ही भरपूर लागेल.

परिणाम भारतीय गौवंश पूर्णपणे समाप्त होईल. कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही. (विदेशी बैलांना भारतीय बैलांसारखे कुबड  नसतात व भारतीय बैलांसारखे  काटक ही नसतात, त्यांचा मांसा शिवाय अन्य उपयोग नाही).  गौमांस खाणे वाढेल. मध्यम वर्ग  आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौमांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल. ४-५ वर्षातच  २० लाख टन पेक्षा गौमांस देशात खपू लागेल. शिवाय ३०-४० लाख  टन गौमांसाचे निर्यात ही होऊ लागेल.

आता जगात सर्वात जास्त गौमांस खाणार्या देश्यात अर्थात युएस मध्ये सर्वात जास्त गाई गौमांसासाठी व्यवसायिक रीतीने पाळल्या जातात. तिथल्याच आंकड्यानुसार  एक गाय ३०० किलो होण्यासाठी ३ वर्ष लागतात.  ३०० किलोच्या गाई पासून ७० किलो मांस मिळते.  एक किलो मांसासाठी  ७-१३ किलो मक्का आणि ३०-४५ किलो चारा लागतो. १५०००  चार्यासाठी लागणारे पाणी (१ किलो मक्या(corn)  साठी १५०० लिटर पाणी लागते), स्वच्छता आणि पिण्यासाठी  ३० हजार लिटर लिटर पाणी. हे सर्व केवळ  १ किलो मांस साठी लागेल. (तेवढ्या पाण्यात  २5  किलो तांदुळाचे, ६० किलो बटाटा,  ३० गहू ).  महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब आणि हरियाणा या  राज्यांत ही जलस्तर २०० फूट खोल गेलेले आहे. दुर्मिळ पाण्याचा उपयोग केवळ  माणसांसाठी खाद्यान्न उत्पन्न करण्यासाठी झाला पाहिजे कि निर्याती साठी मांस उत्पन्न करण्यासाठी.

दुसर्या शब्दात गौमांस निर्यात म्हणजे पाण्याचा व अन्नाचा निर्यात. पाणी कृषीच्या जागी मांस निर्मितीसाठी वापरल्या जाईल. ५० लक्ष टन मांसासाठी  किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल. लोक शेतात मक्का आणि चारा लावतील.(नगदी फसल म्हणून). जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे. गरिबांना दोन वेळचे खाणे अशक्य होईल. शिवाय देशात दुष्काळी वातावरण निर्माण होईल.

अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग  मांस उत्पादनासाठी वापरला  जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल. शिवाय यूएसला $८० बिलीयन विदेशी मुद्रा ही मिळेल. जगाचा विचार केल्यास केवळ गायीचे मांस खाणे बंद झाले तर जगात कुणी ही उपाशी राहणार नाही.

या  भारतीय गायीं विदेशी गायींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात. वर्षाकाठी एक वासरू ही त्या देतात. भारतीय गाई बहुउपयोगी  आहे.   त्यांना खाद्य ही कमी लागते, पाणी ही कमी लागते. (रोज अंघोळ घालावी लागणार नाही, कूलर किंवा एसी  लागणार नाही, विजेचा खर्च वाचेल). शिवाय दुग्ध आणि मांस व्यतिरिक्त विदेशी गायी अन्य उपयोगाच्या नाही.

सध्या पतंजली योग संस्थानात भारतीय गायींवर अनुसंधान सुरु आहे. गौ आधारित कृषी क्रांती त्यांचे लक्ष्य आहे. पुढच्या १० वर्षात किमान १० लाख गायींची दुग्ध उत्पादन क्षमता १० लिटरच्यावर वाढविण्याचे लक्ष्य आहे. भारतीय गायींच्या गौमूत्रापासून औषधी आणि  कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौमूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते). 

आपल्या देश्याच्या वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्यासाठी आणि पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी गौहत्या बंदी सर्व भारतात झाली पाहिजे. या शिवाय लोकांनी मांस खाणे ही सोडले पाहिजे. केवळ मांसासाठी  जनावरे पाळणे ही बंद झाले पाहिजे. लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे. लोकांची भूक शमविण्यासाठी तरी गौ. हत्या बंदीला समर्थन केले पाहिजे.

अधिक माहिती साठी दोन विदेशी लिंक ही देतो आहे.  अंतर्जालावर या विषयावर भरपूर माहिती आहे.


http://ajcn.nutrition.org/content/78/3/660S.full

http://amor.cms.hu-berlin.de/~h1981d0z/pdf/2010-10-viedma/water-footprt.pdf




Monday, April 6, 2015

रामायण कथा : सीता ???


(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही.   माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.)


रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट झाली आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत  समावली. आता ही सीता आहे तरी कोण? वाल्मिकी रामायणानुसार -

                  सीता अथ मे कृषतः क्षेत्रं लाङ्‍गलादुत्थिता ततः ॥ १३ ॥ 

                      क्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता । 


(वाल्मिकीनी रामायणातल्या बालकांडातल्या ६६व्या सर्गात म्हंटले आहे, एकदा मिथिला नरेश राजा सीरध्वज (जनक) यज्ञासाठी भूमि शोधन करते समयी शेतात नांगर चालविताना नांगराच्या अग्रभागाने नांगरलेला भूमितून एक कन्या प्रकट झाली. सीता, नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा, हिच्यापासून उत्पन्न झाल्याकारणाने तिचे नाव सीता ठेवले गेले.  भूतलांतून प्रकट होऊन दिवसेंदिवस वाढणार्‍या राजा जनकच्या  कन्येला  अर्थात  सीतेला, कित्येक राजांनी येथे येऊन मागणी घातली.  जनकाने, जो व्यक्ती  परशुरामाने दिलेले शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवेल, त्याला आपली कन्या देण्याचा निश्चय केला. श्रीरामाने  ते शिवधनुष्य भंग केले आणि सीतेला प्राप्त केले.)

शेत नांगरताना सीता जमिनीतून प्रगट झाली. आता शेतातून प्रगट झालेली ही सीता कोण, हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला. ऋग्वेदात सीता ह्या शब्दाचा उल्लेख आहे.  

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५७ (कृषि सूक्त)

ऋषी - वामदेव गौतम: देवता - सीता छन्द - त्रिष्टुप्


                            अर्वाची सुऽभगे भव सीते वंदामहे त्वा । 

                      यथा नः सुऽभगा अससि यथा नः सुऽफला अससि


भाग्यशालिनी सीते, इकडे आगमन कर, तुला आम्ही वंदन करतो. कारण तेणेंकरून तूं आम्हाला भाग्यधात्री होतेस; आम्हाला सफलार्थ करणारी होतेस. ॥ ६ ॥


इंद्रः सीतां नि गृह्णातु तां पूषा अनु यच्छतु ।
 सा नः पयस्वती दुहां उत्तरांऽउत्तरां समां ॥


सीतेचा स्वीकार इंद्र करो; तो आमच्याकरितां वर्षानुवर्षे दुग्धानें परिप्लुत होऊन आम्हांस  धनधान्यरूप दुग्ध देवो. ॥ ७ ॥


सीतेचे आगमन झाल्याने शेतकरी समृद्ध होतो. वैदिक काळात लोक देवराज इंद्राला बलिभाग अर्पित करायचे आणि इंद्र त्यांचे रक्षण करायचा. हा अन्नरुपी कर म्हणजे सीता. राज्याची सर्व भूमी राजाचीच असते. प्राचीन काळात राजा अन्नाच्या रूपानेच कर घ्यायचा. सीताध्यज नावाचा राजकीय अधिकारी अन्नाच्या रूपाने हा कर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा.  


दक्षिण समुद्रापासून गंगेच्या तटा पर्यंत लंकेच्या राजा रावणाचे साम्राज्य पसरले होते. रावणाचे अधिकारी  ग्रामस्थ, वनवासी सर्व जाती आणि समुदायांकडून ‘सीता’ वसूल करायचे. न्यायानुसार प्रजेकडून वसूल केलेल्या करांचा अधिकांश भाग प्रजेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. पण रावण भारतीय लोकांना गुलाम समजत होता. लंकेची तिजोरी भरणारे गुलाम. गुलामांचा छळ केला पाहिजे. त्यांना अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारातच ठेवले पाहिजे. हीच रावणाची नीती होती. आपल्या वर अन्याय होतो आहे, हे अशिक्षित आणि अज्ञानी माणसाला बहुधा कळत नाही आणि कळले तरी अन्याय आणि अत्याचाराचा विरोध करण्याची क्षमता ही त्याच्यात  नसते. दुसर्या शब्दात म्हणायचे झाले तर रावणाने भरतभूमीच्या सीतेचे हरण केले होते. लंका सोन्याची झाली, तिथले लोक समृद्ध झाले. आपल्या दहा ही इंद्रियाने भौतिक सुखाचा उपभोग करू लागले (आजच्या अमेरिकेच्या प्रमाणे). कदाचित या साठीच रावणाला दशानन म्हंटले असावे.   

ऋषी-मुनी आश्रम स्थापित करून, दंडकारण्यात शिक्षा आणि ज्ञानाचा प्रचार करत होते. साहजिकच त्यांचे हे कार्य रावणाला आवडणारे नव्हते. ऋषी-मुनीचे आश्रम  नष्ट करणे, त्यांची हत्या करणे हे रावणाच्या सैनिकांचे रोजचे कार्य. लंकेचे राज्य अयोध्येच्या सीमेपर्यंत पोहचले होते, तरी ही महाराज दशरथ यांची हिम्मत, रावणा विरुद्ध युद्ध पुकारण्याची नव्हती. वाल्मिकी रामायणात ही याचा उल्लेख आहे.

                       स हि वीर्यवतां वीर्यं आदत्ते युधि रावणः । 

                     तेन चाहं न शक्नोमि संयोद्धुं तस्य वा बलैः ॥
                      सबलो वा मुनिश्रेष्ठ सहितो वा ममात्मजैः ।


(मुनिश्रेष्ठ! तो रावण युद्धामध्ये सामर्थ्यवानांच्या वीर्याचे (बलाचे) ही अपहरण करतो, म्हणून मी आपली सेना आणि पुत्रांसहितही त्याच्याशी आणि त्याच्या सैनिकांशी युद्ध करण्यास समर्थ नाही. ॥ बालकांड २३ १/२ ॥)


पूर्वी परशुरामाने अन्यायी क्षत्रियांचा पराभव केला होता. परशुरामाने जनकाच्या पूर्वज देवरात यांना शिवधनुष्य दिले होते. अश्या वेळी महर्षि विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामाने हेच धनुष्य उचलले आणि भरतभूमीला राक्षसी अत्याचारांपासून मुक्त करण्याचा निश्चय केला. राजा जनकाने ही प्रसन्नता पूर्वक  श्रीरामाला ‘सीता’ अर्पण केली. भरतभूमीला रावणाच्या गुलामीतून मुक्त केल्या शिवाय. सीता श्रीरामाला प्राप्त होणे अशक्य होते. त्या साठी रावणाचे राज्य नष्ट करणे आवश्यक होते. रामाने दंडकारण्यात राहणाऱ्या ग्रामस्थ, निषाद, शबर, भिल्ल, वानर, आश्रमवासी आणि समस्त वनवासी समुदायाला एकत्र केले आणि लंकेवर हल्ला केला.

आता सीता वसूल करण्याचा अधिकार अयोध्येचा राजा अर्थात श्रीरामांचा जवळ आला.  ‘सीता’ अयोध्येत आली. अयोध्या ही सोन्याची झाली. पण प्रजेची समस्या तीच राहिली. शेवटी एका सामान्य प्रजाजानाने राजाला अर्थात श्रीरामचंद्रांना याची जाणीव करून दिली. ‘सीतेचा’ उपयोग पुन्हा प्रजेच्या, शेतकर्यांच्या आणि वनवासी जनतेच्या कल्याणासाठी होऊ लागला. कवीच्या शब्दांत ‘सीता’ पुन्हा वनवासी झाली व जमिनीच्या कुशीत समावली. शिक्षा आणि ज्ञानाचा प्रसार संपूर्ण भरतभूमी वर पसरला.  अश्या रीतीने रामराज्यात चारी वर्णाचे लोक आणि अरण्यवासी प्रजाजन सुखी झाले.  

Friday, April 3, 2015

कथा जीनच्या पेंटची



पुष्कळ दिवसांपासून लेक आणि चिरंजीव दोन्ही मागे लागले होते. बाबा आजकाल तुम्ही वयापेक्षा जास्त म्हातारे दिसू लागला आहात. गेल्यावर्षी झालेल्या बायपास सर्जरी नंतर, आपण म्हातारे दिसू लागले आहोत, ही जाणीव मला ही होऊ लागली होती.  चिरंजीवांचे म्हणणे होते, बाबा   येत्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही जीनची पेंट आणि टी-शर्ट घाला. जीनच्या  पेंटमध्ये तुम्ही जवान दिसाल. तीन एप्रिल माझा वाढदिवस, वयाचे ५४ वर्ष पूर्ण होतील.

मुलांचा आग्रह पूर्ण करण्याचा निश्चय केला. खरं म्हणाल तर माझ्या मनात ही कैक वर्षांपासून  जीनची पेंट घालायची इच्छा  होतीच. पूर्वी मी जीनची पेंट घालीत असे पण गेल्या १६-१७ वर्षांपासून जीनची पेंट घातली नव्हती.  आजकाल बाजारात कमरेपेक्षा पुष्कळ खाली बांधणारी जीनची पेंट मिळते. ती आपल्याला शोभणार नाही. पेंट शिवून घेण्याचा निश्चय केला. सीपीत मोहनसिंग पेलेस जीनच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे, तिथले शिंपी २ तासात जीनची पेंट शिवून देतात.  तसे ही मी दिल्लीत असून ही गेल्या १५-१६ वर्षांत सीपीचा सेन्ट्रल पार्क  पहिला नव्हता. 

काल दुपारी १ वाजता उत्तम नगरहून मेट्रो घेतली, बसायला जागा मिळाली. सीट वर बसून डोळेबंद केले. काळातमागे गेलो. स्टेनो म्हणून सरकारी नौकरीवर रुजू झालो होतो. त्या वेळी अभिताभ स्टाईल रस्त्यावर झाडू लावणारी बेलबाट्म, जीनची पेंट, टी-शर्ट चा क्रेज होता. मला तो दिवस चांगलाच आठवतो, अभिताभ सारखे कानापर्यंत वाढलेले केस, टी-शर्ट आणि जीनची पेंट, या अवतारात आमची स्वारीने त्या वरिष्ठ आईएएस अधिकार्याच्या केबिनमध्ये प्रवेश केला. अधिकाऱ्या समोर उभा राहिलो. (अधिकार्याने आदेश दिल्या शिवाय समोरच्या खुर्ची वर बसायचे नसते, ही सरकारी परंपरा आहे).  त्याने सिगारेट पेटवली आणि झुरके घेत माझ्या कडे निरखून बघू लागला.  समोरचा अधिकारी आपल्याकडे निरखून पाहत आहे, हे लक्ष्यात येताच माझी तर ‘सिट्टी पिट्टी गुम’ झाली. अखेर त्याने माझे नाव विचारले. पुन्हा दोन मिनिटे शांत राहून, त्याने आदेश दिला, मिस्टर पटाईत, कधी आरश्यात स्वत:कड़े बघितले आहे का? हे कार्यालय आहे, माहित आहे का? आता आपले काय होणार या भीतीने मी घाबरलो, घामाघूम झालो. तो पुढे म्हणाला, असे करा, उद्या तुम्ही सुट्टी करा, सकाळी उठून न्हाव्या कड़े जा आणि बच्चन स्टाईल केस भादरून घ्या.  सरकारी कर्मचार्याला शोभेल असे कपडे घालून कार्यालयात येत जा. पैशे नसेल तर मी देतो. (तात्पर्य: पटाईत, तुम्ही एक नम्बरी लोफर दिसत आहत, जरा सभ्य माणसा सारखे दिसा, कार्यालयात सभ्य माणसासारखे कपडे घालोन या, कुठला ही बहाणा चालणार नाही). अजून नौकरीत परमानेंट व्हायची होती, त्या मुळे  अधिकार्याचा आदेश पाळन्या व्यतिरिक्त दूसरा मार्ग नव्हता.  दुखी मनाने आपल्या प्रिय केसांना तिलांजली दिली. टी-शर्ट, जीनच्या जागी, फार्मल पेंट शर्ट घालून कार्यालयात जाऊ लागलो. तरी ही इतर वेळी जीनची पेंट घालायचो.

१९९७मध्ये रायसीना हिल वर स्थित महत्वपूर्ण कार्यालयात बदली झाली. पहिल्याच दिवशी, डोज मिळाला, या कार्यालयात काम करायला मिळणे म्हणजे सौभाग्य.  इथे सभ्यमाणसासारखे बोलावे आणि वागावे लागते. त्या साठी सभ्य दिसणे ही आवश्यक आहे. अर्थातच जीनची पेंट, टी शर्ट वैगरे  इत्यादी घालणे म्हणजे असभ्य आणि लोफर माणसाचे लक्षण. संस्कृती रक्षकांच्या प्रमाणे बुजुर्ग सरकारी अधिकारी ही मागासलेल्या विचारांचे असतात, हेच खर. (क्षणिका - संस्कृति रक्षक, पेंट जीनची व कटू सत्य).

गेल्या वर्षी सरकार बदलली. शिवाय अधिकांश बुजुर्ग कर्मचार्यांपैकी काहींचे प्रमोशन झाले, काही निवृत्त झाले.  कार्यालयात अनुभवाच्या जागी तरुणांना प्राथमिकता दिली जात आहे.  नवीन रुजू झालेल्या २५-३०च्या या तरुणांपैकी अधिकांश टी-शर्ट आणि जीनची पेंट घालणारे. त्या बरोबर नवीन विचार ही आले. अजून तरी कुणाला ही वस्त्रांवरून ताकीद दिली गेली नाही आहे.  अर्थातच काळ बदलतो आहे.

मेट्रो सीपीला पोहचली, त्याच बरोबर विचारांचे शृंखला ही तुटली. सरळ मोहनसिंग पेलेस वर पोहोचलो. पूर्वी सारखीच तिथे जीनची भरपूर  दुकाने होती. दुपारी २ वाजता पेंट शिवायला टाकली. पेंट ४ वाजता शिवून मिळणार होती. आता दोन तास काय करायचे हा प्रश्न होता. सेन्ट्रल पार्क मध्ये जाऊन एखाद्या झुडुपाच्या सावली थोडे पडावे, असा विचार केला.  पूर्वी ही सेन्ट्रल पार्क तरुण- तरुणीचे भेटण्याची जागा होती. आज ही आहे. फरक एवढाच पूर्वी काही तरुण  जोडे दिसायचे, तेही सायंकाळच्या वेळी.  जास्तीसजास्त एका दुसर्यांचे हातात हात घेऊन बसलेले. पण काळ किती बदलला याची जाणीव झाली,  भर दुपारी एप्रिल महिन्याच्या उन्हात, जिथे थोडी सावली होती, केवळ तरुण-तरुणी मोठ्या संख्येने  दो बदन एक जान सारखे बसलेले होते.  लोकलाज मर्यादा विसरून आकंठ प्रेम लीलेत मग्न होते.  लोक आपल्याकडे बघत आहे , फोटो काढत आहेत. कसलीच चिंता त्यांना नव्हती. माझ्या सारखे कित्येक बघे, त्यांना पाहून डोळे तृप्त करत होते. मनात विचार आला, आजची युवा पिढी फाs रच पुढे गेली आहे, सेन्सर बोर्डची गरज आहे का? एप्रिल महिन्याच्या भर दुपारच्या उन्हात, जवळपास अर्धा तास पार्क मध्ये भटकलो, कुठेही बसायला जागा सापडली नाही,   शेवटी कंटाळून ‘मऱ्हाटी’च्या (महाराष्ट्र हस्तकला दालन) समोर असलेल्या काफी हाउस मध्ये जाऊन बसलो. १ कप काफी (२५ रुपये) वर अर्धा-पाउण तास घालविला. एक मनात विचार आला, आपण स्वत: साठी जीनची पेंट घेतो आहे, सौ. साठी काही घेतले पाहिजे.  आज पर्यंत मी कधी एकट्याने सौ. साठी  साडी विकत घेतली नव्हती. आपण घेतलेली साडी सौला पसंद पडेल कि नाही हा ही विचार मनात आला. घड्याळात बघितले साडे तीन वाजले होते, अजून अर्धा तास होता.  वेळ घालवायला ‘मऱ्हाटी’ गेलो. (मराठी स्वाभिमान जागृत झाला, म्हणावे लागेल) अर्धा तास साड्या बघण्याचे नाटक केले, शेवटी एक हिरव्या रंगाची साडी विकत घेतली.  (अर्थातच साडी थोडी महाग वाटली).  ४ वाजता शिंप्याच्या दुकानात गेलो. तिथे पेंट तैयार होती.

आज लेक-जावई आणि चिरंजीवाने मिळून वाढदिवसा निमित्त दुपारचा लंच जनकपुरीतल्या  एका हॉटेल मध्ये दिला. आयष्यात प्रथमच वाढदिवसाचा दिवशी हॉटेल मध्ये गेलो असेल. या पूर्वी घरीच वाढदिवस साजरा करत असे, ते ही कार्यालयाला सुट्टी असेल तर. आपल्या पिताश्रीना टी-शर्ट आणि जीनच्या पेंटमध्ये पाहून मुलांना झालेला आनंद मला त्यांच्या डोळ्यांत दिसत होता.  सौ. ही खूष होती,मी घेतलेली साडी तिला आवडली होती.  या घटकेला, मी ही  स्वत:ला थोड तरुण समजू लागलो आहे. येत्या सोमवारी कार्यालयात ही जीनची पेंट घालून जायचा विचार करतो आहे, बघू.