ग्रीष्माच्या उन्हात,
धरती होरपळी.
विरहाच्या अग्नीत
समुद्र पेटला.
विरही उसांसे,
आकाशी भिडलें.
एकत्र होऊनी,
मेघरूप झाले.
श्रावणी धारांत,
धरती भिजली.
प्रणय गीत ते,
नभी गुंजले.
हिरव्या शालूत,
धरती लाजली.
कुणास पाहून ती
गालात हसली.
गुपित गोड त्यांचे,
कुणा ना कळले.
कवी मनाने,
हृदयी जाणले.