Sunday, June 24, 2012

हे अग्नी माझ्या मार्गातील अडथळे दूर कर – ईशान उपनिषद



अग्ने नय सुपथा राये अस्मान्
विश्वानि देव वयुयानि विद्वान्.

युयोध्यस्म्ज्जुहुराणमेनो

भूयिष्ठां  तेनमउक्तिं विधेम. 

[ईशोपानिषद (मंत्र १8) ]



शाब्दिक अर्थ: हे विश्वदेव विद्वान अग्नी, आपल्याजवळ पोहचण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. ही विनंती. अग्निदेव सर्वज्ञ आहेत, ते सर्व काही जाणतात, त्यांच्या पासून काही ही लपलेले नाही. साधकच्या हातून घडलेल्या वाईट कृत्यांमुळे मुक्तीचा मार्ग अवरुद्ध झालेला आहे. पापांच्या परिणामांपासून मुक्त करण्यासाठी साधक अग्निदेवाची विनंती करीत आहे. अग्निदेव प्रसन्न होउन आपल्या भक्तांवर सदैव कृपा करतात.

आपल्या आयुष्यात अग्नीचे अत्यंत महत्व आहे. अग्नि विना आजच्या जगाची कल्पना आपण करू शकत नाही. आपल्या पोटात ही जठराग्नी जळत असते. ही अग्नी शरीलाला आवश्यक असे पोषक तत्व ग्रहण करते आणि व्यर्थ पदार्थ टाकून देते. काही भक्त व्रत-उपवासाद्वारे आपल्याच शरीराची (शरीरातल्या चरबीची) आहुती या अग्नीत देतात. अग्नीत तापल्या मुळे शरीर आणि मन शुद्ध होतात व परमेश्वरा पर्यंत पोहचण्याचा मार्ग प्रशस्त होतो. अशी अवधारणा.

समस्त भौतिक पदार्थांना शुद्ध करने हा अग्नीचा स्वभावाच आहे. अग्नीत तापल्या मुळे समस्त पदार्थांचे दोष नष्ट होतात. चिकित्सक ही धातूंना अग्नीत जाळून १००% शुद्ध भस्म प्राप्त करतात. या लौह, रौप्य ,सुवर्ण इत्यादी भस्माचा उपयोग व्याधीग्रस्थांची व्याधी दूर करण्यासाठी उपयोग करतात. अर्थात माणसांच्या भौतिक इच्छाही अग्निदेव पूर्ण करतात. फिगर सुंदर ठेवण्यासाठी कुणी तरुणी जठराग्नित आपल्या चरबीची आहुती देते. अग्निदेव तिच्यावर ही कृपा करतात. तिला ही स्लीम फिगर मिळते.

नेता आणि अधिकाऱ्यांच्या मनात सत्ता आणि भौतिक सुखांची आकांक्षा असते. त्यात काहीच गैर नाही. पण त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना गैर-मार्ग वापरावे लागतात. सरकार-दरबारात कागदी घोडे दौडत असल्यामुळे त्यांचे गैर कृत्य सरकारी कागदोपत्री दर्ज होतातच. पहिले या फाईली रिकॉर्ड रूम मध्ये दबलेल्या राहत असे. पण आपल्याला माहीतच आहे. माहितीचा अधिकारामुळे कित्येक दडलेले घोटाळे बाहेर निघाले. कित्येक नेत्यांना आणि अधिकाऱ्याने तिहाडची सुगंधित* हवा खावी लागली (तिहाड जेलच्या एका बाजूला जनकपुरीतली घाण वाहून नेणारा नाला वाहतो. त्याचा सुगंधी वास जेल मध्ये सतत दरवळत राहतो. गेल्याच वर्षांपासून या नाल्याला झाकण्याचे काम सुरु झाले आहे आतापर्यंत ९० टक्के पूर्ण झाले असेल- या महान कैद्यांची कृपा दुसर काय) असो.

सूचनेच्या अधिकारानुसार माहिती ही द्यावीच लागते आणि परिणाम ही भोगावे लागतात. कागद गहाळ कारणे ही सौप नाही कारण त्याची ही चौकशी होणार. कदाचित गहाळ जालेली फाईल पुन्हा प्रगट होऊ शकते. सत्तेच्या खेळात कुणी ही केंव्हा दगा-फटकी करू शकतो. घोटाळे उघडकीस आले तर अश्या नेत्यांचा मार्ग अवरुद्ध होऊ शकतो. सत्ता त्यांच्यापासून दूर होईल. कदाचित तिहाडची हवा ही खावी लागेल.

आपल्याला माहित आहे, अग्निदेव अत्यंत कृपाळू आहेत, आपल्या भक्तांना निराश करीत नाही. अश्या घोटाळेबाज अधिकारी आणि नेत्यांनी अग्निदेवाची प्रार्थना केली आणि अग्नीने ही आपल्या भक्तांवर कृपा केली तर त्यात गैर काय. ‘आगीत फाईली जळाल्या, नेता-अधिकारी पापमुक्त जहाले’. अशारीतीने सर्वकाही जाणाऱ्या अग्निदेवाने आपल्या भक्तांच्या प्रगतीच्या प्रवासाच्या मार्गातले अडथळे दूर केले.

ज्या प्रमाणे अग्निदेवाने त्यांच्या मार्गातले अडथळे दूर केले त्याच प्रमाणे सर्वांच्या मार्गातले अडथळे अग्निदेवाने दूर करावे ही चरणी प्रार्थना.


Sunday, June 17, 2012

सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य



हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं l
तत त्वं पुषन्नपावृणु  सत्यधर्माय दृष्टये l    

[ईशोपानिषद (मंत्र १५) ]

शाब्दिक अर्थ:  सोनेरी तेजाने (आवरणाने) सत्याचे मुख झाकलेले आहे. हे पूषण (पालनकर्ता) कृपया सोनेरी आवरण दूर करा सत्य रुपी धर्म पाहण्या करिता.

सूर्योदयाच्या वेळी सोनेरी रंगाचा सूर्य आपण नेहमीच पाहतो. आज सकाळी बागेत  फिरायला गेलो होतो. सूर्योदयाची वेळ होती, बागेततल्या खुर्चीवर बसून  पूर्व दिशेला सोनेरी रंगात रंगलेल्या  सूर्य  नारायणाला पहात होतो, दहा-पंधरा वर्षांपूर्वी वाचनात आलेला ईशोपनिषदातला हा मंत्र आठवला. मनात विचार आला, सूर्याला आपण क्षणभर ही पाहू शकत नाही.  हा मंत्रदृष्टा ऋषी तर चक्क सोनेरी आवरण दूर करण्याची विनिती देवाला करीत आहे. सत्यरूपी  तळपळणारा सूर्य पाहण्यासाठी. सत्यमार्गावर चालणारा हा मंत्रदृष्टा ऋषी सूर्याचे तेज सहन करू शकत होता.

सत्य हे नेहमीच सुवर्ण आवरणाखाली दडलेल असत.  मोह, माया, ममता लालसा, स्वार्थ इत्यादी अनेक गोष्टी सत्याचा आड नेहमीच येतात.  या  सुवर्णाच्या लोभापायी लोक खऱ्याच खोट करतात  किंवा  सत्याचा पक्ष घ्यायला घाबरतात. राजा हरिश्चंद्राचे आपण गुण गातो पण हरिश्चंद्र बनण्याची कुणाचीही इच्छा नसते.  

भर दरबारात द्रोपदीची अब्रू लुटण्याचा प्रयत्न सुरु होता.  द्रोपदी न्याय मागित होती.  धर्माचे जाणकार भीष्म पितामह  एवम् इतर मंत्री व दरबारी शांत बसून होते किंवा दुर्योधनाला रुचणारी धर्माची व्याख्या करण्यात मग्न होते. (मिळणारा पगार, दरबारातले स्थान, विरोध करण्याचा परिणाम व आपल्याला काय करायचे आहे, त्यांनी जुगार खेळला, भोगू द्या त्यांना त्यांच्या कर्मांची फळे). राजा ही आंधळा होता, गांधारीने चक्क डोळ्यांवरती पट्टी बांधलेली होती. (राजसुखाची लालसा आणि पुत्र मोहामुळे सत्य आणि न्याय मार्गापासून दूर  अशा राजा साठीच  ‘आंधळा’ हे बिरूद कदाचित व्यासांनी धृतराष्ट्रासाठी वापरले असेल आणि पत्नीतर पतीची अनुगामिनी असतेच) जिथे भर दरबारात कुलवधूचे वस्त्र हरण होत असेल त्या राज्यात सामान्य जनतेवर काय आत्याचार होत असतील त्याची कल्पना करणे शक्य नाही.  त्या काळी स्त्रीयांच अपहरण आणि जबरन विवाह तर क्षत्रिय राजांसाठी सामान्य बाब होती. प्रजाही प्रारब्ध मानून असले अत्याचार निमुटपणे सहन करीत होती. परिणाम,  महाभारताचे युद्ध झाले, कित्येक अक्षोहिणी सैन्य रणांगणात ठार झाले. हस्तिनापूरचे राज्य धुळीस मिळाले.  प्रजाजानानाही त्याचे परिणाम भोगावे लागले. युद्धानंतरच्या भीषण वास्तव्याचे महाभारतात जे चित्रण आहे ते दुसऱ्या कुठल्याही ग्रंथात सापडणार नाही. (ब्रह्मास्त्राच्या प्रभावामुळे   दुष्काळ,  अतिवृष्टी  विकृत प्राणी आणि संततीचे जन्म इत्यादी).  जर त्याच वेळी भीष्मपितामह आणि राजा धृतराष्ट्राने पुत्र मोह आवरून सत्य आणि धर्मानुसार निर्णय घेतला असता तर महाभारत घडले नसते. असो.

आज आपण काय पाहतो. जन्म प्रमाणपत्र, जातप्रमाण पत्र, शाळा, कॉलेज मध्ये अडमिशन, नौकरीसाठी लोकांना ‘सुवर्ण’ मोजावे लागतात. व्यापार धंद्या साठी ही  नेता आणि दरबार्याना खुश करावे लागते.  न्याय दरबारी तर परिस्थिती आणखीनच विचित्र. १० रुपये रिश्वत घेणाऱ्या चपरासी जेल मध्ये जातो आणि करोडों बुडविणार्याना जेल नव्हे तर सरकार दरबारात मान मिळतो.  ही वस्तुस्थिती.

देशाला चालविणारे बहुतांश सरकारी अधिकाऱ्यांना ही त्यांना मिळणारे प्रमोशन, सरकारी नौकरीतून निवृत्तीनंतर मिळणारे ‘बक्षिस’  यातच रस असतो. शिवाय  वाहत्या गंगेत हात धुवण्याचा मौका ते का सोडणार.  त्या मुळे सर्वकाही जाणूनही ते मूक राहतात,  न्यायपूर्ण व जनतेच्या हिताचे निर्णय घ्यायला घाबरतात. आज देशाची परिस्थिती महाभारत काळासाराखीच आहे.  परिणाम काय होणार हे जाणून ही सर्व चूप बसलेले आहे. कारण सत्य रूपी सूर्याचे तेज पाहण्याची हिम्मत कुणा मध्ये ही नाही.

मनात विचारांचे काहूर माजलेले होते. सूर्याचे उन आता बोचू लागले होते.  वर आकाशाकडे लक्ष गेल सोनेरी आवरण दूर झालेले होते सूर्याला क्षणभर पाहणे ही आता शक्य नव्हते.  मला माझेच हसू आले.  सूर्य उजेडापासून दूर सुरक्षित व थंड अश्या सुरक्षित घराच्या दिशेने चालू लागलो.

Saturday, June 9, 2012

मृत्यु / एक विचार



मरणाची भीती सर्वांनाच वाटले.  पण प्रत्येकाचा विचार वेगळा काहींचा मते, यात्रेतील एक पडाव, क्षणभराची विश्रांती घेण्याची जागा.


(१)
अनंत पथाचा यात्री 
घेतो इथे
क्षणभर विश्रांति.

(२)


थकलेला- भागलेला जीवाला, निवांत सुखाची झोप, मायेचा पदरीच मिळणार ..


थकलेला पाखरू
परतला  घरी.
मायेचा पदरी
झोप सुखाची.

(३)


शेवटी साथ मृत्युचीच आहे 

नावडती जरी मी
आहे तुझी सहचरी. 
दिवसभर भटकून 
धनी येणार माझ्या 
मिठीत राती.