Monday, May 21, 2012

आयुष्यावर काही क्षणिका


कमरेच्या दुखण्या मुळे गेल्या चार दिवसांपासून घरीच होतो, बिस्तरावर पडल्या-पडल्या  मन स्वैर-भैर भटकत होत. आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता.  

जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश,  दिवस आणि रात्र ...

         (१)

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले. 

        (२)

किती ही जोडा
उरणार शेवटी
 "शून्य".

        (३)

सकाळची चंचलता
दुपारची स्थिरता 
सायंकाळची उदासीनता
विराम रात्रीचा. 

        (४)
 
अस्ताचलचा सूर्य 
रोखण्यास धावतो.
हरणारे युद्ध 
रोज खेळतो.

Saturday, May 12, 2012

समलैंगिकता - सृष्टीच्या विनाशाचा मार्ग



आपणास माहित आहे, परमेश्वराच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. वैज्ञानिक भाषेत याला "बिग बैंग" असे म्हणतात. त्या काळापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव/ पदार्थ "एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. आपल्या सृष्टीचा विकास या मुळेच होत आहे. जेन्ह्वाही इच्छा संपेल सृष्टीही संपेल. आपल्या ज्ञात ब्रम्हांडाचा अंत होईल.

परमेश्वरी इच्छा पूर्ण करण्यासाठी एक कोशकीय जीव स्वत:ला विभाजित करून एका पासून अनेक होतात. परमेश्वराने 'स्त्री-पुरुष' या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. अन्य जिवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा मानवा मधे ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसर्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', 'पुरुष वीर्य' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा मूळ उद्दिष्ट संतान प्राप्ती होय या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते. केवल यौन आनंदा साठी होणार्या स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या संबंधा मुळे विकृत संतती निर्मित होते. म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी, स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना 'विवाहया रूपाने परिभाषित केले.

समलैंगिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची 'एका पासून अनेक होण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकतो का? आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही. समलेन्गिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही.

आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलैंगिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुर आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो जिथे पुरुष वीर्य आणि स्त्री बीज फलित होऊ शकत नाही अश्या मानवजातीला विनाश्याच्या मार्गावर नेण्यार्या समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात.

खरे म्हणजे समलैंगिकता माणसात दडलेली एक विकृती आहे. एक मानसिक आजार आहे. समलैंगिक व्यक्ती कडे सहानभूतीने पाहून, योग्य डॉक्टरी सल्ला आणि चिकित्सा केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. मानसिक विकृती नेहमीच झपाट्याने कुठल्याही समाजात तीव्रतेने पसरते. समलेन्गिक्तेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. तथाकथित बुद्धीजीवी (अति शहाणे) विकृतीला नेहमीच प्रोत्साहन देतात. पण विचार करा जर विधाता निर्मित अन्य जीव-जंतू (उदा: वनस्पती, कीटक, इत्यादी) समलैंगिक संबंध ठेऊ लागले तर त्या जीवांचे अस्तित्व संपेल. सृष्टीचे अन्न-चक्र तुटून जाईल आणि मानवजाती समेत संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?