Saturday, August 12, 2017

प्रदूषण (५) श्रावणात : अंत आणि आरंभ



जीर्ण-शीर्ण कातडी सर्प हा टाकतोच. त्यात शेषाने पृथ्वीला उचलून धरले आहे. जीर्ण कातडी टाकण्यासाठी पृथ्वीला समुद्रात बुडवावे लागेलच. माणसाच्या पाशवी कृत्यांमुळे पृथ्वीचा देह हि जीर्ण-शीर्ण झाला आहे. प्रलय पृथ्वीला पुन्हा नवीन चैतन्य मिळवून देणारा आहे... 



जीर्ण-शीर्ण  कातडी 
शेषाने टाकली. 

प्रलय अमृतात  
धरती न्हाली.

हिरव्या शालूत 
नववधू लाजली. 

प्रीतीचे गाणे 
नभी गुंजले'

  अंकुर चैतन्याचे 
पुन्हा प्रगटले. 

No comments:

Post a Comment