एतत्मांसस्य मांसत्वं प्रवदन्ति मनीषिणः॥
ज्या प्राण्याचे या जन्मी भक्षण कराल,पुढच्या जन्मी तोच प्राणी तुमचे भक्षण करेल. (मनुस्मृति- 5:55)
वैदिक युगाच्या सुरवातीला लोक गौ भक्षणकार्याचे, नंतर कामधेनु स्वरूपी गायींचे महत्व लोकांना कळले आणि तिची हत्या पाप मानल्या जाऊ लागली. गौ हत्येचे फळे आज मानव समाज भोगत आहे.
महाराष्ट्रात गौ हत्या बंदी लागू झाली. तथाकथित अतिशहाण्यांनी स्वाभाविकरित्या गौ बंदीचा विरोध केला. त्या शिवाय त्यांना पुरोगामी कोण म्हणणार. (सध्या १५०-२०० रु किलो ने मिळणारे गौमांस गरिबांचे अन्न आहे, असा दुजोरा ही त्यांनी दिला). सध्या देशातल्या अधिकांश राज्यात गौ बंदी असल्यामुळे गौमांस १५०-२०० रु किलोच्या हिशोबाने मिळते. दूध न देणाऱ्या भाकड गायी आणि शेती साठी अनुपयुक्त बैल विकल्या जातात. पण संपूर्ण देशात गौहत्या बंदी उठल्यावर काय होईल, याची कल्पना देतो. अर्थातच धार्मिक भावनांना महत्व न देता शुद्ध व्यवसायिक आधारावर विवेचन.
गौ. मांसाचे व्यवसायिक उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु होईल. देशी गायींची जागा अधिक मांस असणार्या विदेशी गायी घेतील ज्या प्रमाणे जर्सी गायींच्या आयातीसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार अनुदान देतात तसेच, मांस निर्यातीच्या धन्ध्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अधिक मांस देणाऱ्या गाईंचा आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देईल. सध्या ही गौमांस निर्यातीसाठी अनुदान दिले जाते. या गायी गावात मिळणारे शिळे अन्न, भाजीचा व अन्य कचर्या वर जगणार नाही. त्यांना अन्न ही भरपूर लागेल.
परिणाम भारतीय गौवंश पूर्णपणे समाप्त होईल. कृषी कार्यासाठी बैल मिळणार नाही. (विदेशी बैलांना भारतीय बैलांसारखे कुबड नसतात व भारतीय बैलांसारखे काटक ही नसतात, त्यांचा मांसा शिवाय अन्य उपयोग नाही). गौमांस खाणे वाढेल. मध्यम वर्ग आनंदाने केफसी, मेक्डी इत्यादी जागी गौमांस आधारित व्यंजनांचा आस्वाद घेताना दिसेल. ४-५ वर्षातच २० लाख टन पेक्षा गौमांस देशात खपू लागेल. शिवाय ३०-४० लाख टन गौमांसाचे निर्यात ही होऊ लागेल.
आता जगात सर्वात जास्त गौमांस खाणार्या देश्यात अर्थात युएस मध्ये सर्वात जास्त गाई गौमांसासाठी व्यवसायिक रीतीने पाळल्या जातात. तिथल्याच आंकड्यानुसार एक गाय ३०० किलो होण्यासाठी ३ वर्ष लागतात. ३०० किलोच्या गाई पासून ७० किलो मांस मिळते. एक किलो मांसासाठी ७-१३ किलो मक्का आणि ३०-४५ किलो चारा लागतो. १५००० चार्यासाठी लागणारे पाणी (१ किलो मक्या(corn) साठी १५०० लिटर पाणी लागते), स्वच्छता आणि पिण्यासाठी ३० हजार लिटर लिटर पाणी. हे सर्व केवळ १ किलो मांस साठी लागेल. (तेवढ्या पाण्यात २5 किलो तांदुळाचे, ६० किलो बटाटा, ३० गहू ). महाराष्ट्रातच नव्हे तर पंजाब आणि हरियाणा या राज्यांत ही जलस्तर २०० फूट खोल गेलेले आहे. दुर्मिळ पाण्याचा उपयोग केवळ माणसांसाठी खाद्यान्न उत्पन्न करण्यासाठी झाला पाहिजे कि निर्याती साठी मांस उत्पन्न करण्यासाठी.
दुसर्या शब्दात गौमांस निर्यात म्हणजे पाण्याचा व अन्नाचा निर्यात. पाणी कृषीच्या जागी मांस निर्मितीसाठी वापरल्या जाईल. ५० लक्ष टन मांसासाठी किमान ५ कोटी टन खाद्य आणि १५ कोटी टन चारा ही लागेल. लोक शेतात मक्का आणि चारा लावतील.(नगदी फसल म्हणून). जीवनावश्यक पदार्थ गहू, तांदूळ, डाळी गरीब सोडा तुमच्या आमच्या मध्यम वर्गाच्या आवाक्या बाहेर जातील. अमेरिकेत ही हेच झाले आहे. गरिबांना दोन वेळचे खाणे अशक्य होईल. शिवाय देशात दुष्काळी वातावरण निर्माण होईल.
अमेरिकेत एका वर्षात उत्त्पन्न होणाऱ्या मक्याच्या ७०% भाग मांस उत्पादनासाठी वापरला जातो. त्यात ८० कोटी आफ्रिकन लोकांचे पोट भरता येईल. शिवाय यूएसला $८० बिलीयन विदेशी मुद्रा ही मिळेल. जगाचा विचार केल्यास केवळ गायीचे मांस खाणे बंद झाले तर जगात कुणी ही उपाशी राहणार नाही.
या भारतीय गायीं विदेशी गायींपेक्षा वेगळ्या आहेत. भारतीय गायी इथल्या वातावरणाच्या बदल्याचा सामना करू शकतात. त्यांना अन्न ही कमी लागते. ऊन पाणी, अकाल, इथल्या रोग राई इत्यादींचा सामना त्या करू शकतात. वर्षाकाठी एक वासरू ही त्या देतात. भारतीय गाई बहुउपयोगी आहे. त्यांना खाद्य ही कमी लागते, पाणी ही कमी लागते. (रोज अंघोळ घालावी लागणार नाही, कूलर किंवा एसी लागणार नाही, विजेचा खर्च वाचेल). शिवाय दुग्ध आणि मांस व्यतिरिक्त विदेशी गायी अन्य उपयोगाच्या नाही.
सध्या पतंजली योग संस्थानात भारतीय गायींवर अनुसंधान सुरु आहे. गौ आधारित कृषी क्रांती त्यांचे लक्ष्य आहे. पुढच्या १० वर्षात किमान १० लाख गायींची दुग्ध उत्पादन क्षमता १० लिटरच्यावर वाढविण्याचे लक्ष्य आहे. भारतीय गायींच्या गौमूत्रापासून औषधी आणि कीटनाशकांच्या मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्याचे लक्ष्य आहे.(भाकड गाय आणि बैलाच्या गौमूत्र आणि शेणाचा व्यवस्थित उपयोग केल्यास, रासायनिक कीट नाशकांवर आणि खतांवर जो खर्च होतो त्यात त्यांची गुजराण होऊ शकते).
आपल्या देश्याच्या वाढत्या जनसंख्येचे पोट भरण्यासाठी आणि पाण्याच्या योग्य वापर होण्यासाठी गौहत्या बंदी सर्व भारतात झाली पाहिजे. या शिवाय लोकांनी मांस खाणे ही सोडले पाहिजे. केवळ मांसासाठी जनावरे पाळणे ही बंद झाले पाहिजे. लोक शाकाहारी झाल्या शिवाय वाढत्या जनतेचे पोट भरणे अशक्य आहे. लोकांची भूक शमविण्यासाठी तरी गौ. हत्या बंदीला समर्थन केले पाहिजे.
अधिक माहिती साठी दोन विदेशी लिंक ही देतो आहे. अंतर्जालावर या विषयावर भरपूर माहिती आहे.
http://ajcn.nutrition.org/content/78/3/660S.full
http://amor.cms.hu-berlin.de/~h1981d0z/pdf/2010-10-viedma/water-footprt.pdf
chhan aani mahitipar lekh ahe.
ReplyDelete